शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Lok Sabha Election 2019: पवारांचे वक्तव्य विखेंच्या जिव्हारी; नगरमध्ये प्रचार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 04:57 IST

'हयात नसलेल्या वडिलांविषयी वक्तव्य करणे दुर्दैवी'

मुंबई : १९९१ साली बाळासाहेब विखे यांना कसे पराभूत केले होते, हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विधान विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. वडील हयात नसताना त्यांच्याविषयी केले गेलेले वक्तव्य दुर्दैवी असून त्यामुळे आपण दुखावले गेलो आहोत. विखे घराण्याविषयी त्यांच्या मनात एवढा द्वेष असेल तर मी अहमदनगरमध्ये प्रचार करुन तरी काय उपयोग? असा सवाल विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.डॉ. सुजय विखे यांच्या भाजपाप्रवेशाने उठलेले राजकीय वादळ, त्यातून विरोधीपक्ष नेतेपदाच्या राजीनाम्याची झालेली मागणी, यावर राधाकृष्ण विखे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मुलगा सूजयने भाजपात प्रवेश केला, त्यामुळे आपण विरोधी पक्ष पदावर रहायचे की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. उद्या आपण दिल्लीत त्यांना भेटायला जाणार आहोत, सगळी वस्तूस्थिती त्यांच्यासमोर मांडू. बाळासाहेब थोरात हे पक्षश्रेष्ठी नाहीत, त्यामुळे त्यांच्या विधानाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल त्यांनी मी वेळ आल्यावर बोलेन, असा इशाराही विखे यांनी दिला.काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीतील जागा वाटपावर चर्चा सुरु असताना पवारांनी माझ्या वडीलांविषयी काढलेल्या उद्गाराने मी व्यथीत झालो. आजोबाविषयी असे बोलणे ऐकून कदाचित सूजयने भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असेल, असेही विखे म्हणाले.तुम्ही राष्टÑवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का? असे विचारले असता ते म्हणाले, कोणी कुठे प्रचाराला जायचे यासाठी पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे. ती जो निर्णय देईल त्याप्रमाणे मी प्रचाराला जाईन. अहमदनगरमध्ये मी प्रचार करणार नाही, कारण मी जरी तेथे प्रचाराला गेलो तरी माझ्यावर संशय घेतला जाईल, त्यापेक्षा मी न गेलेला बरा, असेही ते यावेळी म्हणाले.आम्ही इतिहास सांगितला - जयंत पाटीलशरद पवार यांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर कोणतीही टीका केली नव्हती. याआधी नगरमधून कोण निवडून आले होते याची चर्चा सुरु असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी बाळासाहेब विखे यांचा आपण पराभव केला होता, ही जुनी आठवण सांगितली, असे स्पष्टीकरण राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.तर आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, १९९१ साली बाळासाहेब विखे हे अपक्ष उभे होते आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे यशवंतराव गडाख उभे होते. त्यावेळी काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांनीच स्वत: शरद पवार यांना कोणत्याही परिस्थीतीत काँग्रेस तेथून विजयी व्हायला हवी अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे पवारांनी तेथे जोरात प्रयत्न केले व विखेंचा पराभव केला होता. जर राजीव गांधी यांचा आदेश पाळल्याचे दु:ख विखे यांना असेल तर त्यावर मी काय बोलणार?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSujay Vikheसुजय विखे