शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

राहुल गांधींमध्ये दिसतो भविष्यातील पंतप्रधान; लालूंची कन्या भरभरून बोलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:38 IST

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे.

ठळक मुद्देलालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं मीसा भारती यांनी म्हटलंय.

'फिर एक बार, मोदी सरकार'चा नारा देत, भाजपा आणि सत्ताधारी एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडणूक लढवत आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षही जोमाने मैदानात उतरलेत. काही ठिकाणी काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांचा हात धरून महाआघाडीही केलीय. पण, त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. अशातच, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं त्यांनी अगदी जाहीर करून टाकलंय. स्वाभाविकच, काँग्रेसला नवी उमेद मिळाली असून कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी मीसा भारतीही रिंगणात उतरल्या आहेत. २०१४च्या निवडणुकीत पाटलीपुत्र मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपाचे राम कृपाल यादव इथून विजयी झाले होते. परंतु, यावेळी पुन्हा याच मतदारसंघातून मीसा भारती आपलं नशीब अजमावत आहेत. लालूप्रसाद तुरुंगात आहेत, कुटुंबात कलह आहे, तरीही त्यांनी प्रचारात झोकून दिलंय. या पार्श्वभूमीवर, इंडियन एक्स्प्रेसनं त्याची मुलाखत घेतली. त्यात राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल मीसा भारतींनी अगदी मोकळेपणानं मत मांडलं. 

राहुल गांधीकडे मी भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहते. संवेदनशीलता आणि दूरदृष्टीच्या जोरावर भारतातील सर्वात जुन्या पक्षाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे. भारतामध्ये सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक विविधता आहे आणि आर्थिक आणि सामाजिक विषमता आजही पाहायला मिळते. असं असताना, आत्मकेंद्री नेत्याऐवजी केवळ एक हळवा आणि उदार नेताच या देशाला समृद्धीकडे नेऊ शकतो, अशा शब्दांत मीसा भारती यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांबद्दल विश्वास व्यक्त केला. 

सत्तेत आल्यास पंतप्रधान होण्यास तयार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. अर्थात, पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी किंवा कुणा अन्य नेत्याच्या नावावर महाआघाडीत एकमत नाही. त्यामुळेच, मीसा भारती यांनी केलेलं राहुल यांचं गुणगान काँग्रेससाठी विशेष महत्त्वाचं आहे.

दरम्यान, कुटुंबात कुठलेही मतभेद नाहीत, तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्यात कलह नाही, असा दावा मीसा भारती यांनी केला. उमेदवारांच्या निवडीवरून थोडी फार नाराजी प्रत्येक पक्षात असतेच, पण ती क्षणिक होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019pataliputra-pcपाटलीपुत्रLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव