शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

राहुल गांधींमध्ये दिसतो भविष्यातील पंतप्रधान; लालूंची कन्या भरभरून बोलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:38 IST

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे.

ठळक मुद्देलालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं मीसा भारती यांनी म्हटलंय.

'फिर एक बार, मोदी सरकार'चा नारा देत, भाजपा आणि सत्ताधारी एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावरच निवडणूक लढवत आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षही जोमाने मैदानात उतरलेत. काही ठिकाणी काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांचा हात धरून महाआघाडीही केलीय. पण, त्यांनी आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. अशातच, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधींमध्ये मला भविष्यातील पंतप्रधान दिसतो, असं त्यांनी अगदी जाहीर करून टाकलंय. स्वाभाविकच, काँग्रेसला नवी उमेद मिळाली असून कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा 'कंदील' हाती घेऊन काँग्रेस विजयाचा मार्ग शोधणार आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी मीसा भारतीही रिंगणात उतरल्या आहेत. २०१४च्या निवडणुकीत पाटलीपुत्र मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजपाचे राम कृपाल यादव इथून विजयी झाले होते. परंतु, यावेळी पुन्हा याच मतदारसंघातून मीसा भारती आपलं नशीब अजमावत आहेत. लालूप्रसाद तुरुंगात आहेत, कुटुंबात कलह आहे, तरीही त्यांनी प्रचारात झोकून दिलंय. या पार्श्वभूमीवर, इंडियन एक्स्प्रेसनं त्याची मुलाखत घेतली. त्यात राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल मीसा भारतींनी अगदी मोकळेपणानं मत मांडलं. 

राहुल गांधीकडे मी भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहते. संवेदनशीलता आणि दूरदृष्टीच्या जोरावर भारतातील सर्वात जुन्या पक्षाचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली आहे. भारतामध्ये सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक विविधता आहे आणि आर्थिक आणि सामाजिक विषमता आजही पाहायला मिळते. असं असताना, आत्मकेंद्री नेत्याऐवजी केवळ एक हळवा आणि उदार नेताच या देशाला समृद्धीकडे नेऊ शकतो, अशा शब्दांत मीसा भारती यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांबद्दल विश्वास व्यक्त केला. 

सत्तेत आल्यास पंतप्रधान होण्यास तयार असल्याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले आहेत. अर्थात, पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी किंवा कुणा अन्य नेत्याच्या नावावर महाआघाडीत एकमत नाही. त्यामुळेच, मीसा भारती यांनी केलेलं राहुल यांचं गुणगान काँग्रेससाठी विशेष महत्त्वाचं आहे.

दरम्यान, कुटुंबात कुठलेही मतभेद नाहीत, तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्यात कलह नाही, असा दावा मीसा भारती यांनी केला. उमेदवारांच्या निवडीवरून थोडी फार नाराजी प्रत्येक पक्षात असतेच, पण ती क्षणिक होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019pataliputra-pcपाटलीपुत्रLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव