शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

कोलकात्यात डावी आघाडी, काँग्रेसचे आज शक्तिप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 06:21 IST

विधानसभा निवडणूक, तृणमूल, भाजपला देणार आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्ककोलकाता : विधानसभेच्या निवडणुकांसाठी समझोता झालेल्या पक्ष व काँग्रेस यांच्या आघाडीने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर लगेचच शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यांची संयुक्त सभा उद्या, रविवारी येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार असून, त्याद्वारे आपली ताकद दाखविण्याचे या पक्षांनी ठरविले आहे. 

  या आघाडीत इंडियन सेक्युलर फ्रंटही सहभागी होणार असून, रविवारच्या सभेला एक लाखांहून अधिक लोक हजर राहतील, असा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.    सलग ३० वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीचा दहा वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने पराभव केला. तेव्हापासून माकप, भाकप, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, फॉरवर्ड ब्लॉक या डाव्या पक्षांची ताकद कमी होत गेली.  गेल्या निवडणुकीत २९४ पैकी २०९ जागांवर तृणमूल काँग्रेस विजयी झाली. डावे पक्ष व काँग्रेस यांना मिळून ७५ जागा मिळाल्या, पण पुढे आघाडी फुटली आणि दोन्ही पक्षांच्या काही आमदारांनीही पक्षांतर केले. अलीकडे पक्षांतराची लागण तृणमूललाही लागली आणि त्या पक्षाच्या अनेक आमदारांनी राजीनामा देत भाजपची वाट धरली.

ममता यांना मात्र खात्रीमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मात्र बहुमत मिळण्याची खात्री वाढत आहे. भाजपने कितीही जोर लावला  तरी त्या पक्षाला बहुमत मिळू शकणार नाही, असे त्या पक्षाचे नेते सांगत आहेत. निवडणूक नीतीतज्ज्ञ व ममता बॅनर्जी यांचे सल्लागार प्रशांत किशोर यांनी तर ममताच मुख्यमंत्री होतील, असे आपण आताच लिहून देतो, तसे होते की नाही ते निकालाच्या दिवशी पाहा, असे म्हटले आहे.

दोन तृतीयांश बहुमत मिळवून भाजपचे डावपेच उधळून लावूराहुल गांधी, काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहनतुतीकोरिन : अन्य पक्षांचे आमदार फोडून स्वत:चे सरकार स्थापन करणे, असा लोकशाहीला मारक प्रयोग भाजपने सुरू केला आहे. पुदुच्चेरी हे त्याचे ताजे उदाहरण आहे. भाजपचे हे डावपेच उधळून लावण्यासाठी काँग्रेसने केवळ साधे बहुमत मिळवून चालणार नाही. विधानसभा निवडणुकांत दोन तृतीयांश बहुमत मिळाले, तरच भाजपची कारस्थाने थांबविता येतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे केले. ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेश, गोवा, मध्यप्रदेश येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे  भाजपने आपले आमदार फोडले, सरकारे स्थापन केली. राजस्थानातही आपले आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. झारखंडमध्येही सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनीकोणत्याही राज्यात आपल्याला व सहकारी पक्षाला काठावरील बहुमत मिळवण्यात आनंद मानू नये आणि  दोन तृतीयांश बहुमत मिळविण्यासाठी कामाला लागावे. ते झाले, तरच भाजपचा घोडेबाजार थांबविता येईल. राहुल गांधी केरळ, तामिळनाडू व पुदुच्चेरी दौऱ्यावर असून, या तिन्ही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१