शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

४ वेळा पराभूत झालेला नेता ते अण्णाद्रमुकचा प्रमुख चेहरा; मुख्यमंत्री ई पलानीस्वामींचा खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 05:03 IST

माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, त्यांना त्या पदावर फार काळ संधी मिळाली नाही. त्यांच्याजागी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळणाऱ्या पलानीस्वामी यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली.

असिफ कुरणेचेन्नई : अण्णाद्रमुक पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले आणि ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत दोन वेळा लोकसभा आणि दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री ईडाप्पडी पलानीस्वामी (ईपीएस) आज अण्णाद्रमुक पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून जनतेसमोर जात आहेत. पक्षाच्या हायकमांडमध्ये कधीच चर्चेत नसलेले पलानीस्वामी आज पक्षाचे सर्वेसर्वा बनले आहेत.

माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे ओ. पनीरसेल्वम यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. मात्र, त्यांना त्या पदावर फार काळ संधी मिळाली नाही. त्यांच्याजागी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळणाऱ्या पलानीस्वामी यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली. शशिकला यांना झालेला तुरुंगवास, टीटीव्ही दिनकरन्‌ यांचे बंड आणि राज्यातील विपरीत परिस्थितीत देखील त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. सेलम जिल्ह्यातील गुळाचे व्यापारी, शेतकरी असलेले पलानीस्वामी यांना बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण करता आले नाही. १९७४ मध्ये त्यांनी अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश केला. १९८९ मध्ये ईडाप्पडी मतदारसंघातून विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. १९९१ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. मात्र, १९९६ मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९९८ मध्ये ईपीएस यांनी त्रिचेंगोडू लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला; पण १९९९, २००४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २००६ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील त्यांना पराभव पत्करावा लागला; पण ईपीएस यांनी पाच वर्षे आपल्या मतदारसंघात जोरदार काम केले आणि २०११ मध्ये विजय मिळविला.

जयललिता यांचे कट्टर समर्थकएम. जी. रामकृष्णन्‌ यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष दोन गटांत विभागला गेला होता. एक एमजीआर यांची पत्नी व्ही. एम. जानकी गट, तर दुसरा जयललिता यांचा गट. पलानीस्वामी यांनी जयललिता यांची पाठराखण केली. त्यावेळेपासून ते जयललिता यांचे विश्वासू बनले होते. २०११ मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर सेलम जिल्ह्यात त्यांचा दबदबा वाढला. २०१६ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ पैकी १० जागा त्यांनी अण्णाद्रमुकच्या खात्यात घेतल्या होत्या. तामिळ राजकारणात प्रभाव असलेल्या गोंडूर जमातीत त्यांचे प्राबल्य वाढले होते.  

टॅग्स :Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१