शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Raj Thackrey: कोळी बांधव, वारकरी अन् ब्रास ब्रॅन्ड पथक विविध समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’च्या राज दरबारी

By प्रविण मरगळे | Updated: November 11, 2020 12:32 IST

MNS Raj Thackeray News: आज राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली

ठळक मुद्देकार्तिकी एकादशी जवळ आल्याने पंढरपूर मंदिर सुरु करावं अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहेएकादशी निमित्त वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का?; राज ठाकरेंचा सवाल मोठमोठे उत्सव, लग्न समारंभ बंद असल्याने ब्रास ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवासस्थान कृष्णकुंज हे सर्वसामान्य जनतेसाठी समस्या मांडण्याचं ठिकाण बनलं आहे. राज दरबारी मांडलेली समस्या तात्काळ निकाली लागत असल्याचं चित्रही समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडे येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून मनसेकडून समस्या मार्गी लागतील अशी आशा लोकांना आहे.

आज राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली, कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे, यात मंदिर उघडण्याची परवानगी अद्यापही सरकारने दिली नाही, कार्तिकी एकादशी जवळ आल्याने पंढरपूर मंदिर सुरु करावं अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. राज ठाकरेंनी ही समस्या सरकारकडे मांडावी यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा असं राज ठाकरेंना विनंती करण्यात आली. तेव्हा एकादशी निमित्त वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? त्यासाठी काय उपाययोजना करायल्या हव्या असं राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला विचारलं  

तर मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठाणाची जमीन मालकीवर दिली जात नाही अशी तक्रार घेऊन राज ठाकरेंना भेटत आहेत. त्याचसोबत सात-आठ महिन्यापासून लग्न व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे, मोठमोठे उत्सव, लग्न समारंभ बंद असल्याने ब्रास ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत आले आहेत, सगळीकडे अनलॉक करत असताना आमच्यावर बंदी का असं सवाल ब्रास बँन्ड पथकाने विचारला आहे, राज ठाकरेंकडे आमच्या समस्या मांडल्याने त्या सुटतील असा विश्वास या लोकांनी व्यक्त केला.

दरम्यान, सोमवारी मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील कलाकारांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती, ५० टक्के उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी ते नाट्य व्यावसायिकांनी परवडणारं नाही, सिनेसृष्टीला कोरोना काळात मोठा फटका बसला आहे, त्यामुळे या क्षेत्राला सरकारकडून मदत व्हावी यासाठी कलाकारांनी राज ठाकरेंकडे समस्या मांडली. लॉकडाऊन काळात विद्यार्थी पालक, केबल व्यावसायिक, जीम चालक-मालक, डॉक्टर्स, मुंबईचे डब्बेवाले, वाहतूकदार, पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ अशा अनेकांनी राज ठाकरेंकडे समस्या मांडली आणि या समस्या निकाली लागल्याचंही दिसून आलं होतं.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे