शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

केरळ: चर्चा वायनाडची, पण तिरंगी लढतींमध्ये आघाड्यांचा लागेल कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:36 IST

देशातील १०० टक्के साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये यावेळी तीन वेगवेगळ्या आघाड्या आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत.

नवी दिल्ली : देशातील १०० टक्के साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये यावेळी तीन वेगवेगळ्या आघाड्या आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. माकपाच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी आणि कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाहीवादी आघाडी यांच्यात पूर्वापार या राज्यामध्ये लढत होत आहे. यंदा मात्र भाजपनेही येथे ताकद लावलेली आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या तिरंगी लढती रंगतदार ठरणाºया आहेत.मागील निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला आठ तर माकपाला पाच, भाकप आणि आरएसपीला प्रत्येकी एक तर मुस्लीम लीगला दोन जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी कॉँग्रेसला सर्वाधिक ३१ टक्के मते मिळाली होती. त्याखालोखाल माकपाला २२, भाजपा १० तर भाकपला ८ टक्के मते मिळाली होती. अपक्षांनाही १२ टक्के मतांचा लाभ होऊन दोन जागा त्यांना मिळाल्या होत्या. मुस्लीम लीगने ५ टक्के मते घेतली. यानंतर २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर कमी (२३.७० टक्के) झाली. याचा फायदा माकपाला होऊन त्यांची मते वाढली तसेच राज्यात डाव्या आघाडीचे सरकारही आले. या निवडणुकीमध्ये माकपा (२६.५५ टक्के), भाजपा (१०.५३ टक्के), भाकप (८.१२ टक्के) तर मुस्लीम लीग (७.४० टक्के) मते मिळाली होती. शबरीमाला, महापुराची पार्श्वभूमी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश प्रकरणाचा राजकीय लाभ मिळविण्याचा सर्व पक्षाचा प्रयत्न आहे. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुराने झालेले नुकसान हे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे होते.यंदा वेगळे काय?माकपा व भाकपची डावी आघाडी आहे. कॉँग्रेस आणि मुस्लीम लीगची संयुक्त लोकशाहीवादी आघाडी झाली आहे. मागील निवडणुकीतील कामगिरी कायम राखण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे.भाजपच्या नेतृत्वाखालील भाजप,बीडीजेएस आणि टीएलकेसी या पक्षांनी आघाडी केली आहे. भाजप प्रथमच येथून लोकसभेमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहे.काँग्रेसची प्रतिष्ठा पणालावायनाडमधून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूरही रिंगणात आहेत. त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूवरून विरोधक त्यांना अडचणीत आणू पाहत आहेत. मतदारांचा कौल मात्र २३ मे रोजीच कळेल

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाड