शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

केरळ: चर्चा वायनाडची, पण तिरंगी लढतींमध्ये आघाड्यांचा लागेल कस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 03:36 IST

देशातील १०० टक्के साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये यावेळी तीन वेगवेगळ्या आघाड्या आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत.

नवी दिल्ली : देशातील १०० टक्के साक्षर राज्य असलेल्या केरळमध्ये यावेळी तीन वेगवेगळ्या आघाड्या आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. माकपाच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी आणि कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाहीवादी आघाडी यांच्यात पूर्वापार या राज्यामध्ये लढत होत आहे. यंदा मात्र भाजपनेही येथे ताकद लावलेली आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या तिरंगी लढती रंगतदार ठरणाºया आहेत.मागील निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला आठ तर माकपाला पाच, भाकप आणि आरएसपीला प्रत्येकी एक तर मुस्लीम लीगला दोन जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी कॉँग्रेसला सर्वाधिक ३१ टक्के मते मिळाली होती. त्याखालोखाल माकपाला २२, भाजपा १० तर भाकपला ८ टक्के मते मिळाली होती. अपक्षांनाही १२ टक्के मतांचा लाभ होऊन दोन जागा त्यांना मिळाल्या होत्या. मुस्लीम लीगने ५ टक्के मते घेतली. यानंतर २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर कमी (२३.७० टक्के) झाली. याचा फायदा माकपाला होऊन त्यांची मते वाढली तसेच राज्यात डाव्या आघाडीचे सरकारही आले. या निवडणुकीमध्ये माकपा (२६.५५ टक्के), भाजपा (१०.५३ टक्के), भाकप (८.१२ टक्के) तर मुस्लीम लीग (७.४० टक्के) मते मिळाली होती. शबरीमाला, महापुराची पार्श्वभूमी शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश प्रकरणाचा राजकीय लाभ मिळविण्याचा सर्व पक्षाचा प्रयत्न आहे. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुराने झालेले नुकसान हे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे होते.यंदा वेगळे काय?माकपा व भाकपची डावी आघाडी आहे. कॉँग्रेस आणि मुस्लीम लीगची संयुक्त लोकशाहीवादी आघाडी झाली आहे. मागील निवडणुकीतील कामगिरी कायम राखण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे.भाजपच्या नेतृत्वाखालील भाजप,बीडीजेएस आणि टीएलकेसी या पक्षांनी आघाडी केली आहे. भाजप प्रथमच येथून लोकसभेमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहे.काँग्रेसची प्रतिष्ठा पणालावायनाडमधून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी कॉँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूरही रिंगणात आहेत. त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूवरून विरोधक त्यांना अडचणीत आणू पाहत आहेत. मतदारांचा कौल मात्र २३ मे रोजीच कळेल

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKerala Lok Sabha Election 2019केराला लोकसभा निवडणूक 2019wayanad-pcवायनाड