शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मोठा गौप्यस्फोट! "...तेव्हा ममतांनी प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे ओलीस राहण्याची केली होती तयारी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 16:15 IST

Kandahar plane hijack : २४ डिसेंबर १९९९ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीकडे निघालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.

नवी  दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना सातत्याने विरोध करणारे भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा  (Yashwant sinha) यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी १९९९ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात झालेले कंधार विमान अपहरणकांड (Kandahar plane hijack ) आणि  ममता बॅनर्जींच्या (Mamata banerjee ) त्यावेळच्या भूमिकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.  (At the time of the Kandahar plane hijack, Mamata banerjee was offered to become a hostage, Yashwant sinha claims)

डिसेंबर १९९९मध्ये झालेल्या कंधार विमान अपहरणकांडावेळी ममता बॅनर्जींनी अपहृत प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे स्वत: ओलीस म्हणून राहण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा यशवंत सिन्हा यांनी केला आहे. याबाबत यशवंत सिन्हा म्हणाले की,  आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की, डिसेंबर १९९९ मध्ये जेव्हा इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी हे विमान अफगाणिस्तानमधील कंधार येथे नेले होते.  त्या आणीबाणीच्या परिस्थितीत कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू झाली होती. तेव्हा ममता बॅनर्जींनी स्वत: ओलीस म्हणून दहशतवाद्यांकडे जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दहशतवाद्यांनी इतर अपहृत प्रवाशांना दहशतवाद्यांनी सोडावे, अशी दहशतवाद्यांना अट घालण्यात यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. देशासाठी जे काही बलिदान द्यावे लागेल ते देण्याची तयारी त्यांनी केली होती, असे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.

 २४ डिसेंबर १९९९ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीकडे निघालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर हे विमान अमृतसर, लाहोर, दुबई असे फिरवत अखेरीस अफगाणिस्तानला नेले होते.  विमानातील १७६ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांना दुबईत उतरवण्यात आले होते. तर एका प्रवाशाची हत्या करण्यात आली. अखेरीस ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जर्गर या दहशतवाद्यांना सोडण्याची नामुष्की भारत सरकारवर ओढवली होती.   

दरम्यान, यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मात्र भाजपामध्येच आहेत. यशवंत सिन्हा यांनी २०१८ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. पण जयंत सिन्हा भाजपातच राहिले. जयंत सिन्हा हे सध्या झारखंडमधील हजारीबाग येथून भाजपाचे लोकसभा सदस्य आहेत.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीYashwant Sinhaयशवंत सिन्हाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस