शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मोठा गौप्यस्फोट! "...तेव्हा ममतांनी प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे ओलीस राहण्याची केली होती तयारी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 16:15 IST

Kandahar plane hijack : २४ डिसेंबर १९९९ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीकडे निघालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.

नवी  दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना सातत्याने विरोध करणारे भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा  (Yashwant sinha) यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी १९९९ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात झालेले कंधार विमान अपहरणकांड (Kandahar plane hijack ) आणि  ममता बॅनर्जींच्या (Mamata banerjee ) त्यावेळच्या भूमिकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.  (At the time of the Kandahar plane hijack, Mamata banerjee was offered to become a hostage, Yashwant sinha claims)

डिसेंबर १९९९मध्ये झालेल्या कंधार विमान अपहरणकांडावेळी ममता बॅनर्जींनी अपहृत प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे स्वत: ओलीस म्हणून राहण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा यशवंत सिन्हा यांनी केला आहे. याबाबत यशवंत सिन्हा म्हणाले की,  आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की, डिसेंबर १९९९ मध्ये जेव्हा इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी हे विमान अफगाणिस्तानमधील कंधार येथे नेले होते.  त्या आणीबाणीच्या परिस्थितीत कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू झाली होती. तेव्हा ममता बॅनर्जींनी स्वत: ओलीस म्हणून दहशतवाद्यांकडे जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दहशतवाद्यांनी इतर अपहृत प्रवाशांना दहशतवाद्यांनी सोडावे, अशी दहशतवाद्यांना अट घालण्यात यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. देशासाठी जे काही बलिदान द्यावे लागेल ते देण्याची तयारी त्यांनी केली होती, असे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.

 २४ डिसेंबर १९९९ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीकडे निघालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर हे विमान अमृतसर, लाहोर, दुबई असे फिरवत अखेरीस अफगाणिस्तानला नेले होते.  विमानातील १७६ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांना दुबईत उतरवण्यात आले होते. तर एका प्रवाशाची हत्या करण्यात आली. अखेरीस ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जर्गर या दहशतवाद्यांना सोडण्याची नामुष्की भारत सरकारवर ओढवली होती.   

दरम्यान, यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मात्र भाजपामध्येच आहेत. यशवंत सिन्हा यांनी २०१८ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. पण जयंत सिन्हा भाजपातच राहिले. जयंत सिन्हा हे सध्या झारखंडमधील हजारीबाग येथून भाजपाचे लोकसभा सदस्य आहेत.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीYashwant Sinhaयशवंत सिन्हाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस