शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
2
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
3
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
4
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
7
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
8
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
9
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
10
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
11
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
12
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
13
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
14
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
15
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
16
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
17
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
18
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
19
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
20
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल

“काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी नाही, हे खरं”; महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी

By प्रविण मरगळे | Updated: November 19, 2020 11:52 IST

Congress Balasaheb Thorat News: काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी आहे ती दूर केली जाईल, परंतु यामुळे सरकारमध्ये कुठलीही कुरघोडी नाही असंही थोरातांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देएसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवं होतं काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हे खरं आहे. परंतु आम्हीदेखील हक्काने निधी मागून घेतोनिधी वाटप हा अंतर्गत विषय आहे, निधी वाटपाबाबत बसून चर्चा करुन मार्ग काढता येतो

मुंबई – राज्यात वीजबिलावरुन ठाकरे सरकारने घेतलेल्या यु-टर्नमुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरलं आहे. वीजबिलात माफी अथवा सवलत मिळणार नाही, त्यामुळे वीजबिल भरावंच लागेल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. मात्र या निर्णयामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खात्यांना निधी मिळतो, पण काँग्रेस खात्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार काँग्रेसने केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हे खरं आहे. परंतु आम्हीदेखील हक्काने निधी मागून घेतो, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू, काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी आहे ती दूर केली जाईल, परंतु यामुळे सरकारमध्ये कुठलीही कुरघोडी नाही असंही थोरातांनी स्पष्ट केले.

पण 'दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवं होतं असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलं, मात्र निधी वाटप हा अंतर्गत विषय आहे, निधी वाटपाबाबत बसून चर्चा करुन मार्ग काढता येतो, हा फार मोठा विषय आहे असं वाटत नाही, एखाद्या वेळेस निधी कमी मिळाला असेल तर मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा करता येईल. निधीबाबत किती लोकांना फायदा होईल हे पाहून निर्णय घेतला जाईल असं शिवसेना मंत्री अनिल परब म्हणाले. मात्र आज कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचा विश्वासघात- फडणवीस

महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देण्यात येईल असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यानंतरही जनतेला अवाजवी बिलं आली. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरातली सर्व उपकरणं २४ तास वापरल्या तरीही ५ वर्षे जितकं बिल येणार नाही, तितक्या रकमेचं बिल ३ महिन्यांसाठी आलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनसे रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

वीजबिल वसुली करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे, परंतु तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन सरकारला इशाराच दिला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" अशा शब्दात येणाऱ्या काळात मनसे वीजबिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAnil Parabअनिल परबelectricityवीज