शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

“काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी नाही, हे खरं”; महाविकास आघाडीत काँग्रेसची कोंडी

By प्रविण मरगळे | Updated: November 19, 2020 11:52 IST

Congress Balasaheb Thorat News: काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी आहे ती दूर केली जाईल, परंतु यामुळे सरकारमध्ये कुठलीही कुरघोडी नाही असंही थोरातांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देएसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवं होतं काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हे खरं आहे. परंतु आम्हीदेखील हक्काने निधी मागून घेतोनिधी वाटप हा अंतर्गत विषय आहे, निधी वाटपाबाबत बसून चर्चा करुन मार्ग काढता येतो

मुंबई – राज्यात वीजबिलावरुन ठाकरे सरकारने घेतलेल्या यु-टर्नमुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरलं आहे. वीजबिलात माफी अथवा सवलत मिळणार नाही, त्यामुळे वीजबिल भरावंच लागेल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. मात्र या निर्णयामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खात्यांना निधी मिळतो, पण काँग्रेस खात्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार काँग्रेसने केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या खात्यांना निधी मिळत नाही हे खरं आहे. परंतु आम्हीदेखील हक्काने निधी मागून घेतो, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू, काँग्रेसच्या काही मंत्र्यांची नाराजी आहे ती दूर केली जाईल, परंतु यामुळे सरकारमध्ये कुठलीही कुरघोडी नाही असंही थोरातांनी स्पष्ट केले.

पण 'दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएसईबीलादेखील मिळायला हवं होतं असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलं, मात्र निधी वाटप हा अंतर्गत विषय आहे, निधी वाटपाबाबत बसून चर्चा करुन मार्ग काढता येतो, हा फार मोठा विषय आहे असं वाटत नाही, एखाद्या वेळेस निधी कमी मिळाला असेल तर मुख्यमंत्र्यांशी बोलून चर्चा करता येईल. निधीबाबत किती लोकांना फायदा होईल हे पाहून निर्णय घेतला जाईल असं शिवसेना मंत्री अनिल परब म्हणाले. मात्र आज कॅबिनेट बैठकीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचा विश्वासघात- फडणवीस

महाविकास आघाडी सरकारनं जनतेचा विश्वासघात केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देण्यात येईल असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र यानंतरही जनतेला अवाजवी बिलं आली. एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरातली सर्व उपकरणं २४ तास वापरल्या तरीही ५ वर्षे जितकं बिल येणार नाही, तितक्या रकमेचं बिल ३ महिन्यांसाठी आलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनसे रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

वीजबिल वसुली करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे, परंतु तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन सरकारला इशाराच दिला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" अशा शब्दात येणाऱ्या काळात मनसे वीजबिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAnil Parabअनिल परबelectricityवीज