शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

"मोदी सरकारच्या काळात झाला तब्बल १२ हजार कोटींचा लोहखनिज निर्यात घोटाळा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 16:34 IST

Iron ore export scam news : केंद्रात बसलेल्या मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अशी अनेक उदाहरणे दिली आहेत ज्यामुळे स्पष्ट होते की हे सरकार केवळ आपल्या काही मोजक्या मित्रांसाठी सत्तेवर आले आहे.

ठळक मुद्दे२०१४ पूर्वी लोहखनिजाची निर्यात केवळ एमएमटीसीच्या माध्यमातूनच करण्यात येत असे २०१४ मध्ये जेव्हा केंद्रात मोदी सरकार आले तेव्हा हे सर्व नियम कायदे घाई गडबडीत बदलण्यात आले२०१४ पासून आतापर्यंत अनेक खासगी कंपन्यांनीही तुकड्यांच्या माध्यमातून भारतातील लोहखनिज निर्यात करण्यास सुरुवात केली आहे

नवी दिल्ली - गेल्या सहा वर्षांपासून केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप झाला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळाता तब्बल १२ हजार कोटींचा लोहखनिज निर्यात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले की, केंद्रात बसलेल्या मोदी सरकारने गेल्या सहा वर्षांत अशी अनेक उदाहरणे दिली आहेत ज्यामुळे स्पष्ट होते की हे सरकार केवळ आपल्या काही मोजक्या मित्रांसाठी सत्तेवर आले आहे.पवन खेडा म्हणाले की, २०१४ पूर्वी लोहखनिजाची निर्यात केवळ एमएमटीसीच्या माध्यमातूनच करण्यात येत असे. एमएमटीसीसुद्धा केवळ ज्यामध्ये ६४ टक्क्यांपर्यंत लोहखनिजाचा अंश असेल त्याच लोहखनिजाची निर्यात करत असे. त्यावर लोहाचा अंश अशलेल्या खनिजाची निर्यात करण्यापूर्वी एमएमटीसीलासुद्धा सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. एमएमटीसीमध्ये ८९ टक्के भागीदारी ही सरकारची आहे. लोकखनिज निर्यात करण्यापूर्वी ३० टक्के निर्यात शुल्क आकारण्यात येत असे. उच्च प्रतिचे लोहखनिज हे देशात राहावे आणि देशातील स्टिल प्लँटसाठी त्याचा वापर करता यावा हे त्यामागचं कारण होतं.पवन खेडा यांच्या म्हणण्यानुसार २०१४ मध्ये जेव्हा केंद्रात मोदी सरकार आले तेव्हा हे सर्व नियम कायदे घाई गडबडीत बदलण्यात आले. स्टील मंत्रालयाने सर्वप्रथम ६४ टक्के लोहाचा अंश असण्याचा नियम बदलल आणि केआयओसीएलला चीन, तैवान, दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये लोहखनिजाची निर्यात करण्याची परवानगी दिली. याशिवाय मंत्रालयाने आपल्या धोरणात अजून एक बदल करत लोहखनिजाच्या निर्यातीवर ३० टक्के शुल्क लागू राहील. मात्र हे लोहखनिज तुकड्यांच्या रूपात निर्यात केले तर त्यावर कुठल्याही प्रकारचे निर्यात शुल्क लागू होणार नाही.काँग्रेस नेते पवन खेडा यांनी सांगितले की, निर्यातीची परवानगी केआयओसीएलला मिळाली होती. मात्र २०१४ पासून आतापर्यंत अनेक खासगी कंपन्यांनीही तुकड्यांच्या माध्यमातून भारतातील लोहखनिज निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. यावरील शुल्काच्या रूपात हजारो कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे. या खासगी कंपन्यांनी २०१४ पासून आतापर्यंत ४० हजार कोटी रुपयांचे लोहखनिजनिर्यात केले आहे.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनमोल अशा नैसर्गिक संपत्तीची लूट झाली आहे. त्याशिवाय १२ हजार कोटी रुपयांचे निर्यात शुल्कसुद्धा बुडाले आहे. त्यामुळे परदेशी व्यापार कायदा १९९२ नुसार या कंपन्यांवर लोहखनिजाच्या सऱ्यांची बेकायदेशीरपणे निर्यात केल्या प्रकरणी दोन लाख कोटी रुपयांचा दंड लागू होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी केला आहे.

 

 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस