शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

“विधानसभा निवडणुकीच्यावेळी कळालंच नाही, माझा मित्र कोण आहे अन् शत्रू कोण?”

By प्रविण मरगळे | Updated: January 10, 2021 08:54 IST

राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांचे विधान मित्रपक्ष भाजपाशी जोडून पाहिलं जात आहे.

ठळक मुद्देजेडीयू उमेदवारांनी त्यांच्या पराभवासाठी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीऐवजी भाजपा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.संपूर्ण निवडणुकीत एक घोषणा चौबाजुने ऐकायला मिळत होती, एलजेपी-बीजेपी भाई भाईएलजेपीचं काही अस्तित्व नाही, ते पूर्णपणे नियोजित पद्धतीने काम करत होते.

पटना – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळून सरकार स्थापन झालं, या निकालात भाजपानं मुसंडी मारत गेल्यावेळच्या तिप्पट जागा पटकावल्या. तर मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीत शब्द दिल्यामुळे भाजपाने कमी जागा मिळूनही पुन्हा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं, पण महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवली.

बिहारमध्ये सत्ता येऊन ३ महिन्याहून अधिक काळ गेला आहे, पण नितीश कुमार आणि भाजपा यांच्यातील धुसफूस आता समोर येताना दिसत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी जनता दलाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत एक मोठा खुलासा केला आहे. नितीश कुमार यांनी २ दिवसांच्या चालणाऱ्या बैठकीत सांगितले की, निवडणुकीच्यावेळी माझा मित्र कोण आहे अन् शत्रू कोण हे मला माहितीच पडलं नाही असं विधान त्यांनी केले.

राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांचे विधान मित्रपक्ष भाजपाशी जोडून पाहिलं जात आहे. कारण बैठकीत निवडणुकीत हरलेल्या जेडीयू उमेदवारांनी त्यांच्या पराभवासाठी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीऐवजी भाजपा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत जेडीयू उमेदवाराच्या पराभवात भाजपाचा वाटा किती यावर प्रश्न उपस्थित झाले, यात चंद्रिका राय, बोगो सिंह, जय कुमार सिंह, ललन पासवान, अरुण मांझी आणि आसमा परवीन यांचा सहभाग आहे. या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, निवडणुकीत झालेला पराभव लोक जनशक्ती पार्टीमुळे नव्हे तर भाजपामुळे झाला आहे.

मटिहानी विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले जनता दल यूनाइटेडचे उमेदवार बोगो सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण निवडणुकीत एक घोषणा चौबाजुने ऐकायला मिळत होती, एलजेपी-बीजेपी भाई भाई. त्यामुळे त्याचा फटका जेडीयूला बसला असेल हे नाकारू शकत नाही. जे सत्य आहे ते बोललं आवश्यक आहे. जेडीयूचा पराभव होण्यामागे एलजेपीपेक्षा जास्त जबाबदार भाजपा आहे. एलजेपीचं काही अस्तित्व नाही, ते पूर्णपणे नियोजित पद्धतीने काम करत होते. भाजपाच्या मतदारांनी मला मतदान केले नाही असा आरोप त्यांनी केला.

नितीश कुमारांनी सगळ्याचं म्हणणं ऐकलं

विशेषत: ज्यावेळी जेडीयूचे नेते भाजपावर आगपाखड करत होते, त्यावेळी नितीश कुमार आणि पार्टीचे अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी मौन बाळगत सर्वांचे म्हणणं ऐकून घेतले. नितीश कुमार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीपूर्वी ५ महिने आधी एनडीएमध्ये सर्व गोष्टींवर चर्चा होणं आवश्यक होतं परंतु असं झालं नाही. जनता दल यूनाइटेडचे बिहारमध्ये ४५ लाख सदस्य आहेत. तरीही स्थानिक पातळीवर पक्षाचे विचार पोहचू शकले नाहीत त्याचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळाला. मागील काही वर्षात बिहारमध्ये जे काम केले गेले ते जनतेपर्यंत पोहचले नाही याची नाराजीही नितीश कुमारांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक