शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

“विधानसभा निवडणुकीच्यावेळी कळालंच नाही, माझा मित्र कोण आहे अन् शत्रू कोण?”

By प्रविण मरगळे | Updated: January 10, 2021 08:54 IST

राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांचे विधान मित्रपक्ष भाजपाशी जोडून पाहिलं जात आहे.

ठळक मुद्देजेडीयू उमेदवारांनी त्यांच्या पराभवासाठी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीऐवजी भाजपा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.संपूर्ण निवडणुकीत एक घोषणा चौबाजुने ऐकायला मिळत होती, एलजेपी-बीजेपी भाई भाईएलजेपीचं काही अस्तित्व नाही, ते पूर्णपणे नियोजित पद्धतीने काम करत होते.

पटना – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळून सरकार स्थापन झालं, या निकालात भाजपानं मुसंडी मारत गेल्यावेळच्या तिप्पट जागा पटकावल्या. तर मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीत शब्द दिल्यामुळे भाजपाने कमी जागा मिळूनही पुन्हा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं, पण महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवली.

बिहारमध्ये सत्ता येऊन ३ महिन्याहून अधिक काळ गेला आहे, पण नितीश कुमार आणि भाजपा यांच्यातील धुसफूस आता समोर येताना दिसत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी जनता दलाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत एक मोठा खुलासा केला आहे. नितीश कुमार यांनी २ दिवसांच्या चालणाऱ्या बैठकीत सांगितले की, निवडणुकीच्यावेळी माझा मित्र कोण आहे अन् शत्रू कोण हे मला माहितीच पडलं नाही असं विधान त्यांनी केले.

राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांचे विधान मित्रपक्ष भाजपाशी जोडून पाहिलं जात आहे. कारण बैठकीत निवडणुकीत हरलेल्या जेडीयू उमेदवारांनी त्यांच्या पराभवासाठी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीऐवजी भाजपा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत जेडीयू उमेदवाराच्या पराभवात भाजपाचा वाटा किती यावर प्रश्न उपस्थित झाले, यात चंद्रिका राय, बोगो सिंह, जय कुमार सिंह, ललन पासवान, अरुण मांझी आणि आसमा परवीन यांचा सहभाग आहे. या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, निवडणुकीत झालेला पराभव लोक जनशक्ती पार्टीमुळे नव्हे तर भाजपामुळे झाला आहे.

मटिहानी विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले जनता दल यूनाइटेडचे उमेदवार बोगो सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण निवडणुकीत एक घोषणा चौबाजुने ऐकायला मिळत होती, एलजेपी-बीजेपी भाई भाई. त्यामुळे त्याचा फटका जेडीयूला बसला असेल हे नाकारू शकत नाही. जे सत्य आहे ते बोललं आवश्यक आहे. जेडीयूचा पराभव होण्यामागे एलजेपीपेक्षा जास्त जबाबदार भाजपा आहे. एलजेपीचं काही अस्तित्व नाही, ते पूर्णपणे नियोजित पद्धतीने काम करत होते. भाजपाच्या मतदारांनी मला मतदान केले नाही असा आरोप त्यांनी केला.

नितीश कुमारांनी सगळ्याचं म्हणणं ऐकलं

विशेषत: ज्यावेळी जेडीयूचे नेते भाजपावर आगपाखड करत होते, त्यावेळी नितीश कुमार आणि पार्टीचे अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी मौन बाळगत सर्वांचे म्हणणं ऐकून घेतले. नितीश कुमार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीपूर्वी ५ महिने आधी एनडीएमध्ये सर्व गोष्टींवर चर्चा होणं आवश्यक होतं परंतु असं झालं नाही. जनता दल यूनाइटेडचे बिहारमध्ये ४५ लाख सदस्य आहेत. तरीही स्थानिक पातळीवर पक्षाचे विचार पोहचू शकले नाहीत त्याचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळाला. मागील काही वर्षात बिहारमध्ये जे काम केले गेले ते जनतेपर्यंत पोहचले नाही याची नाराजीही नितीश कुमारांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक