शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

“विधानसभा निवडणुकीच्यावेळी कळालंच नाही, माझा मित्र कोण आहे अन् शत्रू कोण?”

By प्रविण मरगळे | Updated: January 10, 2021 08:54 IST

राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांचे विधान मित्रपक्ष भाजपाशी जोडून पाहिलं जात आहे.

ठळक मुद्देजेडीयू उमेदवारांनी त्यांच्या पराभवासाठी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीऐवजी भाजपा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.संपूर्ण निवडणुकीत एक घोषणा चौबाजुने ऐकायला मिळत होती, एलजेपी-बीजेपी भाई भाईएलजेपीचं काही अस्तित्व नाही, ते पूर्णपणे नियोजित पद्धतीने काम करत होते.

पटना – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळून सरकार स्थापन झालं, या निकालात भाजपानं मुसंडी मारत गेल्यावेळच्या तिप्पट जागा पटकावल्या. तर मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयूला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं. निवडणुकीत शब्द दिल्यामुळे भाजपाने कमी जागा मिळूनही पुन्हा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद दिलं, पण महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवली.

बिहारमध्ये सत्ता येऊन ३ महिन्याहून अधिक काळ गेला आहे, पण नितीश कुमार आणि भाजपा यांच्यातील धुसफूस आता समोर येताना दिसत आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी जनता दलाच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत एक मोठा खुलासा केला आहे. नितीश कुमार यांनी २ दिवसांच्या चालणाऱ्या बैठकीत सांगितले की, निवडणुकीच्यावेळी माझा मित्र कोण आहे अन् शत्रू कोण हे मला माहितीच पडलं नाही असं विधान त्यांनी केले.

राजकीय वर्तुळात नितीश कुमार यांचे विधान मित्रपक्ष भाजपाशी जोडून पाहिलं जात आहे. कारण बैठकीत निवडणुकीत हरलेल्या जेडीयू उमेदवारांनी त्यांच्या पराभवासाठी चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीऐवजी भाजपा जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीत जेडीयू उमेदवाराच्या पराभवात भाजपाचा वाटा किती यावर प्रश्न उपस्थित झाले, यात चंद्रिका राय, बोगो सिंह, जय कुमार सिंह, ललन पासवान, अरुण मांझी आणि आसमा परवीन यांचा सहभाग आहे. या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, निवडणुकीत झालेला पराभव लोक जनशक्ती पार्टीमुळे नव्हे तर भाजपामुळे झाला आहे.

मटिहानी विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले जनता दल यूनाइटेडचे उमेदवार बोगो सिंह यांनी सांगितले की, संपूर्ण निवडणुकीत एक घोषणा चौबाजुने ऐकायला मिळत होती, एलजेपी-बीजेपी भाई भाई. त्यामुळे त्याचा फटका जेडीयूला बसला असेल हे नाकारू शकत नाही. जे सत्य आहे ते बोललं आवश्यक आहे. जेडीयूचा पराभव होण्यामागे एलजेपीपेक्षा जास्त जबाबदार भाजपा आहे. एलजेपीचं काही अस्तित्व नाही, ते पूर्णपणे नियोजित पद्धतीने काम करत होते. भाजपाच्या मतदारांनी मला मतदान केले नाही असा आरोप त्यांनी केला.

नितीश कुमारांनी सगळ्याचं म्हणणं ऐकलं

विशेषत: ज्यावेळी जेडीयूचे नेते भाजपावर आगपाखड करत होते, त्यावेळी नितीश कुमार आणि पार्टीचे अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी मौन बाळगत सर्वांचे म्हणणं ऐकून घेतले. नितीश कुमार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीपूर्वी ५ महिने आधी एनडीएमध्ये सर्व गोष्टींवर चर्चा होणं आवश्यक होतं परंतु असं झालं नाही. जनता दल यूनाइटेडचे बिहारमध्ये ४५ लाख सदस्य आहेत. तरीही स्थानिक पातळीवर पक्षाचे विचार पोहचू शकले नाहीत त्याचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळाला. मागील काही वर्षात बिहारमध्ये जे काम केले गेले ते जनतेपर्यंत पोहचले नाही याची नाराजीही नितीश कुमारांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक