शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

सुशांत सिंह राजपूतच्या तपासावरुन गृहमंत्री अनिल देशमुखांचा टोला; सीबीआयनंही दिलं उत्तर

By प्रविण मरगळे | Updated: September 28, 2020 17:06 IST

सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला.

ठळक मुद्देसीबीआयच्या निष्कर्षाची आम्ही वाट पाहतोय, हा तपास दीड महिना झाला सीबीआयकडे आहेसीबीआयचा तपास कुठपर्यंत आला याची आम्हाला उत्कंठा आहे शांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित सीबीआय प्रोफेशनली तपास करत आहे. या प्रकरणातील सर्व बाबींकडे पाहिले जात आहे

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन गेल्या ३ महिन्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संघर्ष सुरु आहे. १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आढळला, सुरुवातीला सुशांतने आत्महत्या केल्याचं बोललं गेलं परंतु त्यानंतर सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता, या तपासात मुंबई पोलिसांवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले, सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये मुलाच्या मृत्यूबाबत गुन्हा नोंदवला. यानंतर संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागलं, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात थेट आदित्य ठाकरेंचे नाव जोडले गेले. राजकीय दबावापोटी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास संथगतीने सुरु असल्याचा आरोप झाला. त्याचसोबत ठाकरे सरकार कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय असंही बोललं गेलं.

सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र गेल्या दीड महिन्यापासून तपासात कोणतीही हालचाल दिसत नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस प्रोफेशनल पद्धतीने आणि चांगल्यारितीने करत होती, त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सीबीआय तपासाचा निकाल काय यासाठी आम्हीही उत्सुक आहोत, सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली असा संभ्रम लोकांमध्ये आहे असा चिमटा त्यांनी काढला.

तसेच सीबीआयच्या निष्कर्षाची आम्ही वाट पाहतोय, हा तपास दीड महिना झाला सीबीआयकडे आहे त्यामुळे तपास कुठपर्यंत आला याची आम्हाला उत्कंठा आहे असा टोला गृहमंत्री अनिल देशमुखांनी विरोधकांना नाव न घेता लगावला आहे. यावर सीबीआयने प्रेस नोट काढून उत्तर दिलं आहे. सीबीआयनं सांगितलं आहे की, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित सीबीआय प्रोफेशनली तपास करत आहे. या प्रकरणातील सर्व बाबींकडे पाहिले जात आहे आणि आजपर्यंत कोणतीही गोष्ट बाहेर आली नाही, तपास सुरु आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेची नाहक बदनामी झाली त्याची भरपाई कोण देणार?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तो ड्रग्स घ्यायचा हे सगळ्यांच्या समोर आलं आहे. दिल्लीची टीम मुंबईत आली तरी काय साध्य झालं? या प्रकरणात जे नेते छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले? सुशांत प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली, त्याची भरपाई कोण करणार? असा सवालही शिवसेना मंत्री अनिल परब यांनी विचारत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCBIगुन्हा अन्वेषण विभागSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतMumbai policeमुंबई पोलीस