शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Happy Friendship Day: पुढील मुख्यमंत्री शरद पवारच होतील; मित्र बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 10:40 IST

शरद पवार(Sharad Pawar) आणि बाळासाहेब ठाकरेंची(Balasaheb Thackeray) पहिली भेट झाली ती बी. के देसाई यांच्यामुळे

ठळक मुद्देशरद पवार १९६७ साली बारामती येथून आमदार म्हणून निवडून आले तर १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली.बाळासाहेबांना भेटण्याआधी शरद पवारांनी बाळासाहेबांचे दसरा मेळाव्याचं भाषण ऐकलं होतं. शरद पवार यांच्यांशी मैत्री झाल्यानंतर बाळासाहेबांनी भागीदारीत एक मासिक काढायचा निर्णय घेतला.

मुंबई –  आज मैत्री दिन..कॉलेजमधील तरूण-तरूणींसाठी उत्साहाचा दिवस. पण राजकीय वर्तुळातही अनेक नेत्यांचे मैत्रीचे किस्से तुम्ही ऐकले असतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घट्ट मैत्री अनेकांनी अनुभवली आहे. राजकारणात कितीही विरोध केला तरी या दोन्ही नेत्यांमधील मैत्रीचे संबंध कधीच तुटले नाही. बाळासाहेब आणि शरद पवार हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च स्थानी आहेत.

शरद पवार(Sharad Pawar) आणि बाळासाहेब ठाकरेंची(Balasaheb Thackeray) पहिली भेट झाली ती बी. के देसाई यांच्यामुळे. शरद पवार १९६७ साली बारामती येथून आमदार म्हणून निवडून आले तर १९६६ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांना भेटण्याआधी शरद पवारांनी बाळासाहेबांचे दसरा मेळाव्याचं भाषण ऐकलं होतं. या दोन्ही नेत्यांमध्ये मैत्री झाली आणि ती आयुष्यभर टिकली. बाळासाहेब शरद पवारांना शरद बाबू म्हणून हाक मारत. १९६० मध्ये बाळासाहेबांनी फ्रि प्रेस जर्नलमधून नोकरी सोडली त्यानंतर शरद पवार यांच्यांशी मैत्री झाल्यानंतर बाळासाहेबांनी भागीदारीत एक मासिक काढायचा निर्णय घेतला.

‘राजनीती’ नावाचं हे मासिक होतं. या मासिकाचं सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हे मासिक चालेल की नाही? हे जाणून घेण्यासाठी दोन्ही नेते बाळासाहेबांच्या भगिनीकडे गेले होते. बाळासाहेबांच्या बहिणीमध्ये देवीचा संचार होत असे. अंगात आल्यावर त्यांना प्रश्न विचारले जात. त्या सांगतील ते खरं मानलं जायचं. बाळासाहेबांनी मासिकाबद्दल त्यांच्या बहिणीला प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी मासिकाची एकही प्रत बाजारात शिल्लक राहणार नाही असं सांगितलं. त्यानंतर हे मासिक चाललंच नाही. शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केल्याप्रमाणे म्हटलं की, बाळासाहेबांच्या भगिनींनी जे सांगितले तसेच घडले. हे मासिक विकलं गेलं नाही म्हणून ते प्रकाशकांकडेच पडून राहिले ते बाजारात आलेच नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी एकत्रित सुरू केलेला हा प्रकल्प त्यांना गुंडळावा लागला.

१९८२ मध्ये मुंबईत गिरणी कामगारांचे संपामुळे वातावरण गरम होते. पुलोदचा प्रयोग यशस्वी करून शरद पवारांनी वेगळी चुल मांडली होती. राज्यात अंतुले यांची सत्ता गेल्यानंतर बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. १९८२ च्या दसरा मेळाव्यात शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि जॉर्ज फर्नांडिस एकाच व्यासपीठावर आले होते. याच काळात चंद्रगुप्त मोर्याने सिंकदरला हाकलले तसे काँग्रेसची सत्ता हाकलून लावा. पुढील मुख्यमंत्री शरद पवारच होतील असं विधान बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं. पुढे जाऊन बाळासाहेबांची ती भविष्यवाणी खरी ठरली आणि शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचं सगळ्यांनी पाहिलं.

पवार यांनी बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले आहेत. एका भाषणात शरद पवार म्हणतात की, ‘‘सुप्रियाच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी मी बाळासाहेबांना विचारले, तुमचा उमेदवार कोण? तर ते चिडले, अंगाखांद्यावर खेळलेल्या मुलीच्या विरोधात उमेदवार द्यायचा का? असे म्हणाले व सुप्रियाची पहिलीच निवडणूक बिनविरोध केली. कुंचल्याने माझ्या वाढलेल्या वजनावर त्यांनी अनेक वार केले, मात्र मैत्रीत त्याचा दुरावा कधीच येऊ दिला नाही. दिलखुलास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य दिले. व्यंगचित्रकार म्हणून त्यांचे स्थान अजोड होते अशा शब्दात पवारांनी बाळासाहेंबांसोबत असलेल्या मैत्रीचं कौतुक केले होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेFriendship Dayफ्रेंडशिप डे