शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"मला भारतीय राजकारणाची लैला बनवलंय, मजनू मागे लागलेत; वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यावर सांगूच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 12:17 IST

Asaduddin Owaisi : हैदराबाद महापालिकेत 150 जागांपैकी टीआरएस 56, भाजपा 48 आणि एमआयएमने 44 जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे.

नवी दिल्ली - तेलंगणामधील हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मात्र या निकालामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. हैदराबाद महापालिकेत 150 जागांपैकी टीआरएस 56, भाजपा 48 आणि एमआयएमने 44 जागा जिंकल्या. महापालिकेत सत्तेसाठी बहुमताचा आकडा 75 आहे. पण तिन्ही पक्ष बहुमतापासून दूर आहेत. टीआरएसला बहुमत मिळाले नसले तरीही महापालिकेत ‘ॲडव्हॉन्टेज टीआरएस’ असे चित्र आहे. पदसिद्ध सदस्यांचे मतदान आणि एमआयएमची भूमिका महापौर निवडीमध्ये महत्त्वाची राहणार आहे.  

हैदराबादचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून, एमआयएमच्या पाठिंब्याशिवाय टीआरएससमोर पर्याय नाही. एमआयएम केसीआर यांच्या टीआरएस पक्षाला पाठिंबा देईल का? असा प्रश्न ओवैसींना विचारला गेला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. मात्र "मला भारताच्या राजकारणाची लैला बनवलं आहे आणि आता सगळे मजनू होऊन मागे लागले आहेत. वेळ येऊ द्या, निर्णय घेतल्यानंतर आम्ही सांगूच" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. 

टीआरएसने तिहेरी तलाक विधेयकावर सरकारला केंद्र सरकारला पाठिंबा दर्शवला होता. तुम्ही त्या विधेयकाविरोधात होते. अशा परिस्थितीत टीआरएस सोबत जाणं योग्य असेल का? असा प्रश्न ओवैसींना केला गेला. त्यावर ओवेसींनी उत्तर दिलं. याच टीआरएसने एनपीआर विरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला. तेलंगणात एनपीआर आणि एनआरसी लागू होणार नाही, असं स्पष्ट केलं. टीआरएस धोरण वेगळं आहे. आमचं वेगळं आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा प्रश्न? तर त्याची अधिसूचना येऊ द्या. आम्ही पक्षात चर्चा करू आणि जो काही निर्णय होईल तो जाहीर करू असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. 

महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही एमआयएमच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे. हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले तरीही चार वरून 48 जागांपर्यंत झेप मारली आहे. तर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएम (AIMIM) ला 44 जागांवर यश मिळाले आहे. 

"जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव", ओवैसींचा घणाघात

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ओवैसी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "जेथे-जेथे अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपाचा पराभव झाला" असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. 'आम्ही भाजपाशी लोकशाहीच्या मार्गाने लढू. तेलंगणाचे लोक भाजपाला राज्यात विस्तार करण्यापासून रोखतील असा आपल्याला विश्वास आहे" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन