शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

लतादीदी, सचिन केंद्रामुळे झाले लक्ष्य- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:05 IST

पॉप सिंगर रिहानावरही केली टीका

ठाणे : लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर ही मोठी माणसे आहेत. एकच हॅशटॅग वापरून केंद्र सरकारने त्यांना ट्विट करायला लावणे अयोग्य होते. अशा मोठ्या मंडळींची प्रतिष्ठा केंद्र सरकारने पणाला लावणे चुकीचे आहे. हा सरकारच्या धोरणांचा विषय होता, देशाचा नव्हे. आता टीकेचे धनी ही मोठी मंडळी होत आहेत, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.राज ठाकरे शनिवारी ठाण्यात पक्षांतर्गत बैठकीसाठी आले होते. माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ज्या पॉप सिंगरच्या ट्विटमुळे हा वाद निर्माण झाला त्या रिहानावरही राज यांनी जोरदार टीका केली. रिहाना ही कोण बाई? तिने ट्विट करण्याआधी ती कोणाला माहीत होती का? या बाईला सरकार उत्तर देतंय की, आमच्या देशाचा प्रश्न आम्ही सोडवू. मग, ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी भाषणे अमेरिकेत करण्याची गरज नव्हती, तो त्यांच्या देशाचा प्रश्न होता. कृषी कायदा चांगला आहे, फक्त तो एक-दोन जणांच्या फायद्याचा ठरू नये, असेही राज म्हणाले.शेतकरी आंदोलन इतके चिघळण्याची गरज नव्हती. सरकारने आणलेला कृषी कायदा चुकीचा नाही. त्याच्यात निश्चित त्रुटी असतील. परंतु केंद्राने प्रत्येक राज्याचा विचार करून राज्यांशी चर्चा करून या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. प्रत्येक राज्याची कृषिधोरणे वेगवेगळी आहेत. प्रत्येक राज्यातील कृषिमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून केंद्राने निर्णय घेतला पाहिजे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. चीन-पाकिस्तान सीमेवर जितका बंदोबस्त नसेल तितका बंदोबस्त शेतकरी आंदोलनात ठेवला आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.राज ठाकरे उवाच:अयोध्येला जाण्याची इच्छा मी व्यक्त केली. मात्र तेथे जाण्याची तारीख निश्चित केलेली नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. वाढत्या इंधन दरवाढीबाबत राज म्हणाले की, वीजदरवाढीविरोधात सरकार निर्णय घेत नाही ते इंधन दरवाढीविरोधात काय घेणार? एकीकडे शिवसेना इंधन दरवाढीविरोधात, तर दुसरीकडे भाजप वीजबिलवाढीविरोधात आंदोलन करीत आहे. हा लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. भाजपला आंदोलन करण्याची काय गरज? त्यांनी केंद्राशी बोलावे.अदानी-पवार भेटीने वीजमाफी रद्द?वीजबिल माफीसाठी राज्यपाल कोश्यारी यांची आम्ही भेट घेतली. त्यांनी शरद पवारना भेटा असे सांगितले. पवार यांना भेटलो. त्यांनी वीज कंपन्यांना पत्र देण्यास सांगितले. परंतु गौतम अदानी यांनी पवार यांची भेट घेतली व वीजबिल माफ न करण्याचे सरकारने जाहीर केले, असा आरोप ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेLata Mangeshkarलता मंगेशकरSachin Tendulkarसचिन तेंडुलकर