शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

'सरकारी अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूचे फटके द्या', मोदी सरकारच्या मंत्र्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 14:57 IST

giriraj singh says beat up officials with sticks if they dont listen : सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य लोकांकडून अशा नेहमी तक्रारी वारंवार माझ्याकडे येत असतात, असे गिरीराज सिंह सांगितले.

ठळक मुद्देशनिवारी बिहारच्या बेगूसराय येथील खोदवांपूरमधील एका कृषी संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना गिरीराज सिंह यांनी लोकांना त्यांच्या समस्येबद्दल संवेदनहीन असलेल्या अधिकाऱ्यांना 'बांबूच्या काठीने मारण्याचा' सल्ला दिला.

नवी दिल्ली : भाजपाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्री गिरीराज सिंह आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहचीच चर्चेत असतात. त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी जर तुमच्या तक्रारी ऐकल्या नाहीत तर त्यांना बांबूच्या काठीने फटके द्या, असे विधान गिरीराज सिंह यांनी आपल्या बेगूसराय मतदारसंघातील लोकांना संबोधित करताना केले आहे. शनिवारी बिहारच्या बेगूसराय येथील खोदवांपूरमधील एका कृषी संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना गिरीराज सिंह यांनी लोकांना त्यांच्या समस्येबद्दल संवेदनहीन असलेल्या अधिकाऱ्यांना 'बांबूच्या काठीने मारण्याचा' सल्ला दिला.

सरकारी अधिकारी वारंवार लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असतात. सामान्य लोकांकडून अशा नेहमी तक्रारी वारंवार माझ्याकडे येत असतात, असे गिरीराज सिंह सांगितले. तसेच, ते म्हणाले, "मला या लोकांना सांगायचे आहे की, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे कशाला येता... खासदार, आमदार, गावचे प्रमुख, डीएम, एसडीएम, बीडीओ… या सर्वांचे कर्तव्य आहे की त्यांनी जनतेची सेवा केली पाहिजे. जर त्यांनी तुमचे ऐकले नाही तर मग दोन्ही हातात बांबूची काठी घ्या आणि त्यांच्या डोक्यावर मारा. तसेच, जर असेही करूनही तुमचे काम होत नसेल तर मी तुमच्यासोबत आहे."

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपूर्वी  गिरिराज सिंह यांनी राहुल गांधींच्या हम दो हमारे दो वक्तव्याबद्दल टीका केली होती, ते म्हणाले होते की, "राहुल गांधींनी या घोषणेचा संदर्भ स्वत:साठी दिला होता. ते स्वत:, त्यांची आई, त्यांची बहीण आणि त्यांच्या बहीणीचा पती यांच्याबद्दल ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणात अर्थसंकल्पाबद्दल साधा एक शब्दही उच्चारला नाही", यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले होते.

आरजेडीचा हल्लाबोलगिरीराज सिंह यांच्या विधानावरून आरजेडीने बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार चालू आहे की महाजंगलराज चालू आहे?, असा सवाल आरजेडीने उपस्थित केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदी