शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे इंधन दरवाढ :पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 20:06 IST

Prithviraj Chavan Satara-केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच हट्टवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाट दरवाढ झालेली आहे. इंधनावर लादलेला मोठा कर कमी केला तरी दर कमी करता येणे शक्य आहे. मोदींनी एका हाताने दिले अन दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देमोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे इंधन दरवाढ :पृथ्वीराज चव्हाण मोदींनी एका हाताने दिले दहा हातांनी काढले; खुली चर्चा करायला काँग्रेस तयार

सातारा : केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच हट्टवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाट दरवाढ झालेली आहे. इंधनावर लादलेला मोठा कर कमी केला तरी दर कमी करता येणे शक्य आहे. मोदींनी एका हाताने दिले अन दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.सातारा येथील काँग्रेस कमिटीमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला आघाडीच्या धनश्री महाडिक, युवकचे अध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आदींची उपस्थिती होती.आ. चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारच्या भूमिकेमुळेच इंधन, गॅस यांची भाववाढ झालेली आहे. कोरोनातील लसीकरण, किसान सन्मान योजना, गॅसचे मोफत वाटप या योजना राबविण्यात आल्याचे मोदी सांगत असले तरी सरकारच्या तिजोरीतून वाटलेल्या पैशांपेक्षा कितीतरी जास्त पैसे मोदींनी लोकांच्या खिशातून काढून घेतले आहेत. इंधन दरवाढ करुन लोकांवर बोजा टाकण्यात आलेला आहे. पाकिस्तानात ५१ रुपयांना पेट्रोल मिळते. आपल्याकडे मात्र आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी इंधनावर भरमसाट कर लादण्यात आलेला आहे, तो मोदींनी पहिल्यांदा कमी करण्याचा निर्णय घ्यावा.दरम्यान, इंधनदरवाढ ही मागील सरकारच्या चुकीच्या आयात धोरणांमुळे झाल्याचा आरोप मोदींनी केला आहे, याबाबत विचारले असता, ह्यआम्ही त्याबाबत खुली चर्चा करायला तयार आहोत. देशात ८५ टक्के तेल आयात केलं जातं. काँगे्रसने जे केलं ते खुलेपणाने आम्ही मांडलेलं आहे, असे स्पष्टीकरण आ. चव्हाण यांनी केले.तेलाचे किती साठले शोधले ते सांगा...!काँग्रेस सत्तेवर असताना देशांतर्गत इंधनाचे साठे शोधून काढण्यात आले. बॉम्बे हाय हे त्याचे उदाहरण आहे. आपल्या देशात ८५ टक्के तेल आयात करावे लागतं, अशा परिस्थितीत केंद्रातील सत्तेच्या सहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारने देशांतर्गत तेलाचे किती साठे शोधून काढले, ते त्यांनी स्पष्ट करावं, असे आव्हान देखील आ. चव्हाण यांनी दिले.

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSatara areaसातारा परिसर