शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

सरकारचे चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे - मुख्यमंत्री ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 04:07 IST

सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई : माझ्या सरकारला तीन चाके आहेत अशी टीका केली गेली, मात्र चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे होते, हे विरोधकांना दिसलेच नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र घाबरला नाही व घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते.

सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी ठामपणे हे सरकार चालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या सरकारला कसलाही धोका नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हे सरकार पाडण्यासाठी अनेक आमिषे दिली गेली मात्र हे सरकार पडले नाही आणि पडणारही नाही. अनेक अडचणी आल्या, मात्र आपण त्यातून मार्ग काढला, दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा करणारा एकही निर्णय वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने घेतला नाही, असे सांगून अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, त्यांनी ती तातडीने जाहीर करावी अशी विनंती करतो असे सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून, चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचं काम केलं आहे.  यावेळी राज्य शासनाने वर्षभरात शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी आदी घटकांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी बनवलेल्या ''महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही'' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री देसाई यांनी प्रास्ताविक केले.

सरकारला धोका नाही सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी ठामपणे हे सरकार चालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या सरकारला कसलाही धोका नाही. गेल्यावर्षी शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचा उल्लेख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे