शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

Devendra Fadnavis : "आम्ही भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 20:23 IST

Devendra Fadnavis : आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पाडणे आमचे बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठळक मुद्देया पक्षात मी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आहे. आमच्या अजेंड्यावर कोविड असून सरकार पाडणे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई : आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही, असे विधान राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, आमचा एक विकासाचा अजेंडा असून तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावे लागेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 'लोकसत्ता'ने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. (former chief minister and bjp leader devendra fadanvis slams maharashtra government)

सरकार पडणे हा तुमच्या प्रतिक्षेचा भाग असायला हवा का? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, "आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. केवळ भजनं म्हणण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावे लागेल. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचे नाही".

याचबरोबर, सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर आम्ही करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणे आमचे बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय, या वेबिनारमध्ये अंतर्गत विरोधाभास दिसत असताना त्याला पाडणे हाच भाजपाचा कार्यक्रम असल्याची प्रतिमा का निर्माण होत आहे? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. यावर, "अशी प्रतिमा काही निर्माण होत नाही. पण माध्यमांनाही बातमी मिळते की हे पाडण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतात. या पक्षात मी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आहे. आमच्या अजेंड्यावर कोविड असून सरकार पाडणे नाही", असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

'हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल'"मी म्हणालो होतो त्याप्रमाणे घडत आहे. आपल्या अंतर्गत विरोधाने हे सरकार पडेल सांगितले तेव्हा लोकांना खरं वाटत नव्हते. पण आता लोकांना जाणवू लागले आहे. धोरणात्मकतेचा अभाव लोकांना जाणवत आहे. मी गंमतीने तीन पायांची रिक्षा असून तीन पाय वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचे म्हणायचो, पण आज हे जाणवत आहे. मला वाटते आमच्याकडे खूप संयम आहे. आम्ही विरोधी पक्षाचे काम अचूक करत आहोत. जनतेची गाऱ्हाणी मांडत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की, आम्हाला काही करायची गरज नाही, हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'तो निर्णय चूकच होता, पण पश्चाताप नाही'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पाहाटेचा शपथविधी सोहळ्याची अद्यापही चर्चा होताना दिसते. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतीमेला तडा गेला असे विधान पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. ते म्हणाले, "आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावे लागते. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचे होते. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केले. परंतु ते चुकीचे होते आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडले नाही. त्यांच्यात माझी जी प्रतीमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण