शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

Farmers Protest : या राज्यातील भाजपा सरकार संकटात, विरोधक आणणार अविश्वास प्रस्ताव

By बाळकृष्ण परब | Updated: February 23, 2021 10:29 IST

Farmers Protest: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या आंदोलनाचा फटका भाजपाला पंजाब विविध राज्यांमध्ये बसत आहे.

ठळक मुद्देहरियाणाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यातील मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात आघाडी उघडली आहेराज्यातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहेकाँग्रेस या सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे

चंदिगड - गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे (Farmers Protest) केंद्रातील मोदी सरकारच्या नाकी नऊ आणले आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या आंदोलनाचा फटका भाजपाला पंजाब (Punjab), पश्चिम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणामध्ये बसत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता हरियाणामधील भाजपा सरकार संकटात सापडले आहे. (Congress will bring a no-confidence motion against Khattar Government) हरियाणामधील मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याचा दावा करत विरोधकांनी या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. (BJP government in crisis in Haryana due to Farmers Protest)शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच हरियाणामध्ये राजकारणही तापले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यातील मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. हुड्डा म्हणाले की, राज्यातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे काँग्रेस या सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. खट्टर सरकारमधील मित्रपक्षाचे आमदारच हे सरकार सर्वात भ्रष्ट असल्याचे सांगत आहेत.

मनेहरलाल खट्टर सरकारला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच भाजपा-जजपा आघाडीतील काही आमदारच हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे सांगत आहे, असा टोला भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी लगावला आहे.दरम्यान, हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाने कृषी कायद्यांवरून भाजपाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सोनीपतमधील पुरखास गावात राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनी रविवारी शेतकऱ्यांची महापंचायत आयोजित केली होती. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच जेव्हापासून देशात भाजपाचे सरकार आले आहे. तेव्हापासून देशातील जनता त्रस्त झालेली आहे. वाढत्या महागाईने देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणाBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण