शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची अस्तित्वाची, तर भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:57 IST

जालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे.

- संजय देशमुखजालना लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूल आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे सलग पाचव्यांदा या मतदार संघातून निवडणूक लढवत असून, यावेळीही विजयासाठी ते अथक प्रयत्न करताना दिसून येत आहे. पक्षबांधणी आणि केलेली विकास कामे या मुद्दयावर ते मत मागत आहेत.काँग्रेसाठी ही निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजयश्री खेचून आणता आली नाही. दानवे हे २००९ चा अपवाद वगळता नेहमीच कुठल्याना कुठल्या लाटेवर निवडणुन आले आहेत. यंदा अशी कुठलीच लाट नसल्याने त्यांना मोठे परिश्रम घ्यावे लागत आहे. मध्यंतरी मित्रपक्षाचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना निवडणुकीत आव्हान देण्याची गर्जना केली होती. त्यामुळे त्यांचे मन वळवितांना दानवेंची मोठी दमछाक झाली. यामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच श्रीकृष्णाची भूमिका निभवावी लागली होती. मोठ्या प्रयत्नांती खोतकर यांचे बंड शमविण्यात यश आले.हे जरी खरे असले तरी दानवे आणि खोतकरांच्या वादात शिवसैनिक भरडला गेला. नेमके कोणाचे ऐकावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता. आता हा मुद्दा निकाली निघाल्यावर खोतकर आणि दानवे गळ्यात गळे घालून फिरत आहेत. मात्र, शिवसैनिक कुठली भूमिका घेतात ही देखील महत्वाची बाब ठरू शकते.

भाजपकडे कुशल संघटन कौशल्य असल्याने त्या जोरावर दानवे यांची स्थिती मजबूत असल्याचे बोलले जात आहे. परंतू, केंद्र आणि राज्यातील सरकारने शेतकरी विरोधी घेतलेली भूमिका तसेच राफेलचा मुद्दा आणि शहीद सैनिकांच्या नावावर मते मागण्यासाठीचा आटापिटा या बाबी न पटणाऱ्या आहेत.त्यातच दानवे यांनी केलेले शेतकरी विरोधी वक्तव्यही नागरिक विसरलेले नाही तर दुसरीकडे काँग्रेसने स्वच्छ प्रतिमा असलेल्या सेवादलाचे राज्य अध्यक्ष विलास औताडे यांना मैदानात उतरविले आहे. यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी दिसत नाही. प्रत्येकजण औताडे यांना विजयी करण्यासाठी जिवाचे रान करत आहे. विकासकामे करताना दानवे यांनी त्यांच्या नातेवाईकांचे आर्थिक हित कसे जपले हा मुद्दा औताडेकडून प्रचारात उचलला जात आहे. वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे किती मते खेचतात याकडे लक्ष लागून आहे.
>गेल्या पाच वर्षामध्ये केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने विविध विकास कामांना कोट्यावधी रूपयांचा निधी खेचून आणला. ड्रायपोर्ट, आयसीटी, जिल्ह्यातील रस्ते आदंीचा यात समावेश आहे. या निवडणुकीत आपण विकासाच्या मुद्दयावरून मत मागणार असून, जनता निश्चित साथ देईल- रावसाहेब दानवे, भाजप>विकासाच्या नावाखाली गेल्या पाच वर्षामध्ये केवळ धुळफेक करण्यात आली आहे. २० वर्षापासून भाजपचेच खासदार असताना पाहिजे तसा विकास झालेला नाही. एकूणच प्रस्तापितांविरूद्ध यावेळी वातावरण असल्याने त्या वातावरणाचा आपल्याला निश्चित फायदा होणार आहे.- विलास औताडे, काँग्रेस>कळीचे मुद्देकाँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा जिल्ह्यात असलेला कमी संपर्क महत्वाचा मुद्दा ठरू शकतो.भाजप-शिवसेनेचे मनोमिलन झाले असले, तरी याचे पडसाद प्रत्यक्ष मतदानावर कसे पडतात हे २३ मे ला मतमोजणीनंतर कळणार आहे.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019jalna-pcजालना