शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत आम्ही निवडणुका जिंकू शकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून घरचा अहेर

By कुणाल गवाणकर | Updated: November 22, 2020 19:07 IST

पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल नोंदवले अनेक आक्षेप; बदलांची मागणी

नवी दिल्ली: गेल्या दोन लोकसभा निवडणुकांसह अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसमधील कलह आता समोर येऊ लागले आहेत. वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्त्वावर थेट निशाणा साधल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं आहे. त्यांनी नेतृत्त्वावर थेट टीका केली नसली तरी पक्षामध्ये अनेक आमूलाग्र बदल घडवण्याची मागणी केली आहे. पक्षात कोणतीही बंडखोरी नसल्याचं आझाद यांनी स्पष्ट केलं. 'बंडखोरी एखाद्याला हटवण्यासाठी होते. वजीर राजावर सैन्य घेऊन हल्ला चढवतो आणि राजाला सिंहासन गमवावं लागतं, याला बंडखोरी म्हणतात. काँग्रेसमध्ये तशी स्थिती नाही. इथे आम्ही काही बदलांसाठी आग्रही आहोत. इथे वजीर राजाला त्याची चूक दाखवत आहेत. एखाद्या कृतीचे, निर्णयाचे परिणाम वजीर राजाला सांगत आहे. त्याला सतर्क करत आहे. आम्ही बदलांची मागणी करत आहोत. कारण बदल झाल्यास पक्ष आणि देश अडचणीत सापडेल', असं आझाद यांनी सांगितलं.एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवलं. 'फाईव्ह स्टार संस्कृतीमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत. आता पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी मिळाल्यास ते थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातात. त्यातही फाईव्ह स्टारमधील डिलक्सला प्राधान्य असतं. त्यांना फिरण्यासाठी वातानुकूलित कार हवी असते. एखाद्या ठिकाणी कच्चा रस्ता असल्यास नेते तिथे जात नाहीत. जोपर्यंत पक्षातील ही फाईव्ह स्टार संस्कृती संपत नाही, तोपर्यंत आपण निवडणुका जिंकू शकणार नाही,' असं परखड मत आझाद यांनी मांडलं.काँग्रेसची अवस्था इतकी वाईट कशी झाली, यावरही आझाद यांनी विस्तृत भाष्य केलं. 'पहिल्यांदाच पक्षाची स्थिती इतकी दयनीय आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संवाद संपला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बसून निवडणूक लढवल्या जात नाहीत. आता एखाद्याला पद मिळाल्यास तो लगेच व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड छापतो. आता आपलं काम संपलं असं त्याला वाटतं. मात्र खरंतर पद मिळाल्यापासून त्याचं काम सुरू होतं. पण ही जाणीव अनेकांना नसते,' अशा स्पष्ट शब्दांत आझाद यांनी त्यांची मतं मांडली.

टॅग्स :congressकाँग्रेस