शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

...तोपर्यंत आम्ही निवडणुका जिंकू शकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून घरचा अहेर

By कुणाल गवाणकर | Updated: November 22, 2020 19:07 IST

पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल नोंदवले अनेक आक्षेप; बदलांची मागणी

नवी दिल्ली: गेल्या दोन लोकसभा निवडणुकांसह अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसमधील कलह आता समोर येऊ लागले आहेत. वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्त्वावर थेट निशाणा साधल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं आहे. त्यांनी नेतृत्त्वावर थेट टीका केली नसली तरी पक्षामध्ये अनेक आमूलाग्र बदल घडवण्याची मागणी केली आहे. पक्षात कोणतीही बंडखोरी नसल्याचं आझाद यांनी स्पष्ट केलं. 'बंडखोरी एखाद्याला हटवण्यासाठी होते. वजीर राजावर सैन्य घेऊन हल्ला चढवतो आणि राजाला सिंहासन गमवावं लागतं, याला बंडखोरी म्हणतात. काँग्रेसमध्ये तशी स्थिती नाही. इथे आम्ही काही बदलांसाठी आग्रही आहोत. इथे वजीर राजाला त्याची चूक दाखवत आहेत. एखाद्या कृतीचे, निर्णयाचे परिणाम वजीर राजाला सांगत आहे. त्याला सतर्क करत आहे. आम्ही बदलांची मागणी करत आहोत. कारण बदल झाल्यास पक्ष आणि देश अडचणीत सापडेल', असं आझाद यांनी सांगितलं.एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवलं. 'फाईव्ह स्टार संस्कृतीमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत. आता पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी मिळाल्यास ते थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातात. त्यातही फाईव्ह स्टारमधील डिलक्सला प्राधान्य असतं. त्यांना फिरण्यासाठी वातानुकूलित कार हवी असते. एखाद्या ठिकाणी कच्चा रस्ता असल्यास नेते तिथे जात नाहीत. जोपर्यंत पक्षातील ही फाईव्ह स्टार संस्कृती संपत नाही, तोपर्यंत आपण निवडणुका जिंकू शकणार नाही,' असं परखड मत आझाद यांनी मांडलं.काँग्रेसची अवस्था इतकी वाईट कशी झाली, यावरही आझाद यांनी विस्तृत भाष्य केलं. 'पहिल्यांदाच पक्षाची स्थिती इतकी दयनीय आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संवाद संपला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बसून निवडणूक लढवल्या जात नाहीत. आता एखाद्याला पद मिळाल्यास तो लगेच व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड छापतो. आता आपलं काम संपलं असं त्याला वाटतं. मात्र खरंतर पद मिळाल्यापासून त्याचं काम सुरू होतं. पण ही जाणीव अनेकांना नसते,' अशा स्पष्ट शब्दांत आझाद यांनी त्यांची मतं मांडली.

टॅग्स :congressकाँग्रेस