शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

UP Election 2022: “योगीजी, तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास नाही का, तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:47 IST

UP Election 2022: तुम्ही धर्माच्या आड कितीही लपून बसला, तरीही तुमचा पराभव होईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

मुंबई: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणूक (UP Election 2022) जाहीर झाल्यापासून तेथील राजकीय वातावरण अधिकच तापताना दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच उत्तर प्रदेशमदील निवडणूक ८० विरुद्ध २० अशी असेल, असे म्हटले होते. त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या कामांवर तुम्हाला विश्वास नाही का? तुमचे सरकार रामभरोसे झाले आहे का, अशी खोचक विचारणा मलिक यांनी केली आहे. 

ज्या पद्धतीने योगींनी ८० विरुद्ध २० टक्क्यांवरून विधान केले आहे की, जे लोक राम मंदिराचा विरोध करत आहेत. त्यांच्याशी सामना हा ८० टक्के लोकांचा आहे. त्यांनी थेट मुस्लिमांविरोधात हे विधान केलेले आहे. योगीजी तुम्ही इतिहास तपासून पाहावा, राम मंदिर-बाबरी मशीद विवादापासून सर्व मुस्लीम संघटना असतील, मुस्लीम असतील एकच सांगत होते की न्यायालयाचा जो निर्णय येईल आम्ही तो मान्य करू, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. 

कोणीच त्याचा विरोध करत नाही

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक नेहमीच सांगत आले आहेत की, आम्ही न्यायालयाचा निर्णय मान्य करणार नाही. आम्हाला वाटते की, जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय केला, देशाने स्वीकारला. कोणीच त्याचा विरोध करत नाही. मंदिर निर्माणाचे काम सुरू आहे आणि तरीही तुम्ही मंदिरावरून वादग्रस्त वक्तव्य करत आहात. आपल्या कामांवर तुम्हाला विश्वास नाही का? तुमचे सरकार रामभरोसे झाले आहे का, असा प्रश्न मलिकांनी विचारला आहे. 

हे योगीजींच्या पराभवाचे मुख्य कारण बनणार

आम्हाला वाटते की, ज्या प्रकारचे विधान योगी करत आहेत, हे स्पष्ट होत आहे की भाजप उत्तर प्रदेशमध्ये पराभूत होत आहे. लोकामध्ये त्यांच्या विरोधात असलेला राग आणि नाराजी हे योगीजींच्या पराभवाचे मुख्य कारण बनणार आहे. तुम्ही धर्माच्या आड कितीही लपून बसला, तरीही तुमचा पराभव होईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. 

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असून, उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. कोरोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला असून, कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.  

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२nawab malikनवाब मलिकyogi adityanathयोगी आदित्यनाथ