शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

सलग सुट्ट्यांमुळे वाढली उमेदवारांची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 06:57 IST

मुंबईसह राज्यातील १७ जागांवर २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी आलेल्या सलग सुट्ट्या, लगीनसराई यामुळे उमेदवार आणि निवडणूक आयोगाच्या चिंता मात्र वाढल्या आहेत.

मुंबई : मुंबईसह राज्यातील १७ जागांवर २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, त्याआधी आलेल्या सलग सुट्ट्या, लगीनसराई यामुळे उमेदवार आणि निवडणूक आयोगाच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. सलग सुट्ट्यांचे निमित्त करून लोकांनी पिकनिकचे प्लान केल्यास मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि राजकीय नेत्यांनी नागरिकांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी शासकीय कार्यालये-आस्थापना, बँकांना सुट्टी असते. शिवाय, अनेक खासगी, कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही पाच दिवसांच्या आठवड्याचे सूत्र वापरले जाते. त्यामुळे शनिवार २७ आणि रविवार २८ एप्रिलला अनेकांना सुट्टी असणार आहे. त्यातच सोमवारी २९ एप्रिलला मतदानामुळे मिळणाºया आणखी एका सुट्टीची भर पडणार आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे अनेक जण सहकुटुंब पर्यटन, देवदर्शन वगैरेसाठी प्रवासाचे बेत आखण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याचा संभव आहे.त्यात भर म्हणजे सध्या लग्नसराईचा काळ आहे. शिवाय, २६, २७ आणि २८ या तिन्ही दिवशी लग्नाचे मुहूर्त आहेत. अनेकांनी आधीच मुहूर्त आणि मंगल कार्यालयांच्या उपलब्धतेनुसार तारखा निश्चित केल्या आहेत.कोकण अथवा पश्चिम महाराष्ट्रात मूळ गावी लग्न करण्याचा ट्रेंड अनेक घरांमध्ये असतो. तशीच स्थिती पोटापाण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड वगैरे भागातून मुंबईत स्थायिक झालेल्या अन्य भाषिकांची आहे. २६, २७ आणि २८ दरम्यान आप्त आणि मित्रमंडळींच्या आपापल्या भागातील लग्नाला हजेरी लावून २९ ला मतदानासाठी मुंबईत परतणे अनेकांना शक्य होणार नाही. या सर्वांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.>डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाहीच्या निर्मितीसाठी जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. लग्नसभारंभ किंवा अन्य काही कार्यक्रम ठरवले असले तरी मतदानाचा दिवस मोकळा ठेवावा, मतदानापुरता तरी वेळ लोकांनी काढायला हवा. गावी जाणाºया नागरिकांनी २९ एप्रिलनंतरचा बेत ठरवावा, असे आवाहन आम्ही मतदारसंघात करत आहोत.- राहुल शेवाळे, खासदार आणि दक्षिण मध्यचे शिवसेना उमेदवारगावी जा किंवा आणखी कुठेही जा, पण त्याआधी मतदान करा. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. देशात स्वच्छ सरकार यायला हवे. त्यासाठी मतदान आवश्यक आहे.- आमदार नसीम खान,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष>वीकेण्डला जोडून मतदानाचा दिवस असल्यामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. हा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. आयपीएल सामन्यांदरम्यानही मतदानाच्या जागृतीसाठी जाहिरातबाजी केली जाणार आहे. तसेच नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘माय फस्ट व्होट माय सेल्फी’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.- शिवाजी जोंधळे,मुंबई शहर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019