शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

दक्षिण मुंबईत थेट लढतीमुळे उर्वरित सर्वांचे डिपॉझिट जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 23:47 IST

निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांचा आकडा मोठा असला, तरी खरी लढत ही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्येच असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे

मुंबई : निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांचा आकडा मोठा असला, तरी खरी लढत ही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्येच असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे, तर कधी या प्रमुख पक्षांतील नाराज बंडोबा अपक्ष उमेदवारी दाखल करतात. प्रतिस्पर्धीची मतं खाण्यासाठीही काही उमेदवार उतरविलेले असतात. मात्र, प्रमुख उमेदवार सोडल्यास ८० ते ९० टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचेच चित्र आहे.दक्षिण मुंबई मतदार संघातून आपले नशीब आजमावणाऱ्या हौशा-गवशांचा आकडा मोठा असला, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजपा युती अशा थेट लढतीत रंगत आली आहे. मुंबईतील अन्य लोकसभा मतदार संघांच्या तुलनेत दक्षिण मुंबईतून सर्वात कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. २००४ मध्येही या मतदार संघात केवळ सात उमेदवार होते, तर २००९ आणि २०१४ मध्ये प्रत्येकी २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, येथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत कायम राहिल्यामुळे उभय पक्षांच्या उमेदवारांमध्येच सर्व मतं विभागली गेली आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व उमेदवारांचे डिपॉझिट प्रत्येक निवडणुकीत जप्त झाल्याचे चित्र आहे. यावेळेस १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.>डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणून किती लागतात मते?एखाद्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार की नाही, हे त्याला मिळालेली मते आणि एकूण वैध मते यांच्या प्रमाणावर अवलंबून असते. कोणत्याही उमेदवाराला एकूण वैध मतांच्या किमान १६ टक्के मते मिळवावी लागतात. तेवढी मिळाली नाहीत, तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Mumbaiमुंबई