शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

“युती अन् आघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:37 IST

Uddhav Thackeray: जास्तीत जास्त गावांत पोहचा, लोकांशी संपर्क वाढवा. आपण ज्या योजना राबवतोय त्या लोकांपर्यंत पोहचतायेत की नाही याची खातरजमा करा.

ठळक मुद्दे१२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त जनतेची कामं करा. निवडणुका येतील जातील. पण लोकांचा विश्वास संपादन करा

मुंबई – केंद्रात कॅबिनेट विस्तार झाल्यानंतर राज्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्ष बळकट करणासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडली. खासदार अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.

या बैठकीनंतर खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा. माझं गाव कोरोनामुक्त गाव अशी मोहिम राबवा. गावागावांत शिवसंपर्क अभियान सुरू करा. जनतेची काम करा. पक्ष बळकट करा. विधानसभानिहाय, तालुकानिहाय, पंचायतनिहाय पूर्वतयारी आहे. १२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

तसेच जास्तीत जास्त गावांत पोहचा, लोकांशी संपर्क वाढवा. आपण ज्या योजना राबवतोय त्या लोकांपर्यंत पोहचतायेत की नाही याची खातरजमा करा. प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त जनतेची कामं करा. शिवसेना पक्ष ही आपली जबाबदारी आहे. १९६६ पासून आजपर्यंत आपण इथपर्यंत कसं आलोय ते जाणून घ्या, शिवसेनाप्रमुखांचा विचार घराघरात पोहचवण्याचं काम करा. निवडणुका येतील जातील. पण लोकांचा विश्वास संपादन करा असं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंनी केले असं अनिल देसाईंनी सांगितले.

शिवसेना नेहमी निवडणुकांना सामोरे जाते. निवडणुकीची तयारी सुरूच असते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत. शिवसेनेसाठी स्वबळ म्हणजे पक्ष बळकट करण्याचे आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वबळ वापरलं जातं. जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे महाविकास आघाडीचे तिन्ही नेतृत्व ठरवेल त्यानुसार शिवसैनिक काम करतील असंही अनिल देसाई म्हणाले.

सहकार हा राज्याचा विषय

घटनेप्रमाणे पाहिले तर सहकार हा राज्याचा विषय आहे. सहकाराचे काही पैलू तरतुदी असतात. त्यात केंद्र सरकारची मर्यादित भूमिका असते. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या सहकार चळवळीला बळकटी आणण्यासाठी नवा विभाग केला असेल तर चांगले आहे. परंतु दबावापोटी राज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न कराल तर ते घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.   

राजकीय आकसापोटी कुणावरही कारवाई होऊ नये.

सध्याच्या काळात ईडी, सीबीआय या यंत्रणेचा वापर कसा केला जातोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. एकनाथ खडसेंवरील ईडीची कारवाई होत असेल तर आमचं इतकचं म्हणणं आहे की, राजकीय आकसापोटी कुणावरही कारवाई होऊ नये असंही अनिल देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक