शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

“युती अन् आघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:37 IST

Uddhav Thackeray: जास्तीत जास्त गावांत पोहचा, लोकांशी संपर्क वाढवा. आपण ज्या योजना राबवतोय त्या लोकांपर्यंत पोहचतायेत की नाही याची खातरजमा करा.

ठळक मुद्दे१२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त जनतेची कामं करा. निवडणुका येतील जातील. पण लोकांचा विश्वास संपादन करा

मुंबई – केंद्रात कॅबिनेट विस्तार झाल्यानंतर राज्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्ष बळकट करणासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची आज बैठक पार पडली. खासदार अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला.

या बैठकीनंतर खासदार अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, कोरोनामुक्तीसाठी प्रत्येक गावात काम करा. माझं गाव कोरोनामुक्त गाव अशी मोहिम राबवा. गावागावांत शिवसंपर्क अभियान सुरू करा. जनतेची काम करा. पक्ष बळकट करा. विधानसभानिहाय, तालुकानिहाय, पंचायतनिहाय पूर्वतयारी आहे. १२ जुलै ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

तसेच जास्तीत जास्त गावांत पोहचा, लोकांशी संपर्क वाढवा. आपण ज्या योजना राबवतोय त्या लोकांपर्यंत पोहचतायेत की नाही याची खातरजमा करा. प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही फक्त जनतेची कामं करा. शिवसेना पक्ष ही आपली जबाबदारी आहे. १९६६ पासून आजपर्यंत आपण इथपर्यंत कसं आलोय ते जाणून घ्या, शिवसेनाप्रमुखांचा विचार घराघरात पोहचवण्याचं काम करा. निवडणुका येतील जातील. पण लोकांचा विश्वास संपादन करा असं मार्गदर्शन उद्धव ठाकरेंनी केले असं अनिल देसाईंनी सांगितले.

शिवसेना नेहमी निवडणुकांना सामोरे जाते. निवडणुकीची तयारी सुरूच असते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत. शिवसेनेसाठी स्वबळ म्हणजे पक्ष बळकट करण्याचे आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वबळ वापरलं जातं. जिथे जिथे निवडणुका आहेत तिथे महाविकास आघाडीचे तिन्ही नेतृत्व ठरवेल त्यानुसार शिवसैनिक काम करतील असंही अनिल देसाई म्हणाले.

सहकार हा राज्याचा विषय

घटनेप्रमाणे पाहिले तर सहकार हा राज्याचा विषय आहे. सहकाराचे काही पैलू तरतुदी असतात. त्यात केंद्र सरकारची मर्यादित भूमिका असते. त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या सहकार चळवळीला बळकटी आणण्यासाठी नवा विभाग केला असेल तर चांगले आहे. परंतु दबावापोटी राज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न कराल तर ते घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.   

राजकीय आकसापोटी कुणावरही कारवाई होऊ नये.

सध्याच्या काळात ईडी, सीबीआय या यंत्रणेचा वापर कसा केला जातोय हे सगळ्यांनाच माहिती आहे. एकनाथ खडसेंवरील ईडीची कारवाई होत असेल तर आमचं इतकचं म्हणणं आहे की, राजकीय आकसापोटी कुणावरही कारवाई होऊ नये असंही अनिल देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक