शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात, गिरीश बापट म्हणतात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 17:03 IST

BJP News : देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांच्याच संरक्षणाचीच फौज सक्षम आहे

सातारा - सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा त्यांची पकड आहे हे मला मान्य नाही. आम्हीही ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरलो आहे, असा दावाच खा. गिरीश बापट यांनी केला. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांच्याच संरक्षणाचीच फौज सक्षम आहे असेही ठामपणे त्यांनी सांगितले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर खा. गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ते दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.खा. बापट म्हणाले, महात्मा गांधींचा खेड्याकडे चला हा विचार केंद्र शासनाने अमलात आणला आहे. खेडोपाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. खेड्यातील स्वयंरोजगाराला चालना देण्यात येत आहे. ह्यमनरेगाह्णसारख्या योजना सुरू आहेत. हे सर्व कोणामुळे होत आहे हे लोकांनाही माहीत आहे. याचा बेस आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत याचा फायदा भाजपला नक्कीच होईल. तसेच भाजपचे संघटन वाढून पक्षाला बळही मिळेल.सातारा जिल्ह्याचे प्रश्न माहीत आहेत. राजकारण कसे चालते याचीही माहिती आहे. भाजपच्या संघटनासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून खा. बापट पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी भाजपने कमी-अधिक फरकाने पॅनल उभे केले आहे. तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भाजपचे अडीच हजार कार्यकर्ते निवडून येतील.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व इतर काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर खा. गिरीश बापट म्हणाले, अभ्यास करून एखाद्या नेत्याच्या बंदोबस्तात फरक होतो. याचा अर्थ दुर्लक्ष होत आहे, असा होत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबतही असे झाले. यामध्ये राजकीय आकस आहे, असे मला वाटत नाही. तरीही भाजपचे व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांची फौज संरक्षणासाठी सक्षम आहे.सदिच्छा भेटीत उदयनराजेंशी गळा भेट... खा. गिरीश बापट सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. साताऱ्यात आल्यावर प्रथम त्यांनी जलमंदिर येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले यांची गळाभेट घेतली. तर खा. बापट यांनी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंवर स्तुतिसुमने उधळली. उदयनराजे आणि सर्व कुटुंबीय हे माझे आदर्श आहेत. मी नेहमीच जलमंदिरात भेटायला येत असतो. ही सदिच्छा भेट आहे. सामान्य माणसांशी नाळ आणि त्यांच्यावरील प्रेम हे त्यांचे गुण आहेत. या गुणांमुळे उदयनराजे हे माझे एकदम जवळचे मित्र आहेत, असेही यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgirish bapatगिरीष बापट