शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देवेंद्र फडणवीसांचा घणाघात; बाळासाहेबांच्या काळातला ‘सामना’ अन् आताची अवस्था सांगितला फरक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 10:33 IST

आम्ही सरकार पाडण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. सरकार पाडण्याची घाई नाही असं वारंवार आम्ही सांगतोय पण चोराच्या मनात चांदणे अशी शिवसेनेची अवस्था आहे,

ठळक मुद्देअंतर्विरोधामुळे हे सरकार एकरुप नाही असं समाज मनाची अवस्था त्यांना काय लिहियाचं ते त्यांचे त्यांना लखलाभ आहे देवेंद्र फडणवीसांनी घेतला सामना अग्रलेखाचा समाचार

मुंबई – शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. त्याला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीनं ५ वर्ष जरुर सरकार चालवावं त्यांना शुभेच्छा आहेत. पण सामना एवढा अंतर्विरोध कुठेच झाला नाही, रोज आपली भूमिका बदलतात असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.

याबाबत टीव्ही ९ शी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामनानं कधी पवारांविरोधात लिहिलं कधी बाजूने लिहिलं, राज्यपालांविरोधात लिहिलं परत बाजूने लिहिलं, सातत्याने भूमिका बदलत असतात. सामनाला स्वत:चा बेस नाही, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातल्या ‘सामना’ची आज काय अवस्था झाली आहे. भूमिका नसणारा सामना, लांगूनचालन करणारा सामना, त्यावर काय प्रतिक्रिया देणार? त्यांना काय लिहियाचं ते त्यांचे त्यांना लखलाभ आहे असा टोला शिवसेनेला लगावला.

तसेच आम्ही सरकार पाडण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही. सरकार पाडण्याची घाई नाही असं वारंवार आम्ही सांगतोय पण चोराच्या मनात चांदणे, म्हणून त्यांना रोज सरकार पडणार नाही असं सांगावे लागत आहे. त्यांच्या अंतर्विरोधामुळे हे सरकार एकरुप नाही असं समाज मनाची अवस्था आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

सामना अग्रलेखात काय म्हटलं?

मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा गोंधळ झाला व त्या बदल्यांतून अविश्वासाचे वातावरण उघड झाले, असे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यात तथ्य आहे असे वाटत नाही व त्याबाबत मनधरणी वगैरे करण्यासाठी गृहमंत्री देशमुख पवारांना घेऊन ‘मातोश्री’वर पोहोचले, असे सांगणे व छापणे हेच मुळी मानसिक गोंधळाचे लक्षण आहे. दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल, सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत. हे विचित्र आहे. सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँगेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, ‘सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत.’ शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? असा सवाल विरोधकांना विचारण्यात आला होता.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

…तर देशाचं राजकारण ठिसूळ पायावर उभं आहे असं समजावं; शिवसेनेचा फडणवीसांना चिमटा

राजगृह निवासस्थान तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

VIDEO: एक शरद; सगळे गारद! संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा टीझर आला

५ दिवसांत २ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ; रुग्णालयाच्या भोंगळ कारभारानं कुटुंबाला मनस्ताप

आता २ वर्षात मिळणार एमसीए कोर्सची पदवी; एआयसीटीईचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा