शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दिल्लीच्या मुख्य सचिवांना मारहाण प्रकरणातून केजरीवाल-सिसोदिया यांची निर्दोष सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 14:44 IST

Delhi CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आपच्या इतर नऊ आमदारांवर दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण केल्याचा आरोप होता.

नवी दिल्ली:दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह नऊ आमदारांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दिल्‍लीतील एका विशेष न्यायालयाने बुधवारी या सर्वांची एका मारहाणीच्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.

दिल्लीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नऊ आमदारांवर दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण केल्याचा आरोप होता. पण, आता हा आरोप सिद्ध न झाल्यामुळे दिल्लीतील विशेष न्यायालयाने या सर्वांची सुटका केली आहे. पण, आपचे आमदार अमानतुल्लाह खान आणि प्रकाश जरवाल यांना राउज एव्हेन्‍यू कोर्टाने आरोपी ठरवले आहे.

'सत्याचा विजय'न्यायालयाच्या या निकालनंतर दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत 'सत्याचा विजय झाला' असे म्हटले आहे. तर, उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदियांनी, 'दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना मुख्‍य सचिवांना मारहाण केल्याच्या खोट्या आरोपातून मुक्त करण्यात आले. सत्यमेव जयते,'असे म्हटले.

13 जणांवर आरोपदिल्लीचे तत्कालीन मुख्य सचीव अंशु प्रकास यांना मारहाण केल्याचा आरोप आपच्या नेत्यांवर होता. यात आपचे आमदार नितिन त्यागी, ऋतुराज गोविंद, संजीव झा, अजय दत्त, राजेश ऋषी, राजेश गुप्ता, मदन लाल, प्रवीण कुमार आणि दिनेश मोहनिया यांची नावे होती. सीएम केजरीवाल आणि डेप्युटी सीएम सिसोदिया यांना मिळून एकूण 13 जणांवर मारहाणीचा आरोप लावण्यात आला होता.

काय आहे प्रकरण ?प्रकरण 2018 चे आहे. 19 फेब्रुवारीच्या रात्री दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश एका बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी गेले होते. बैठकीनंतर अंशु प्रकाश यांनी केजरीवालांसमोर आपच्या आमदारांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला होता. वैद्यकीय चाचणीमधयेही त्यांना मारहाण झाल्याची पुष्टी झाली होती. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप