शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

देश व लोकशाही वाचविण्यासाठी विरोधकांचा एकजुटीचा निर्धार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:42 IST

दंगली व विद्वेष पसरविणाऱ्या, देशातील घटनात्मक संस्था मोडून टाकणा-या मोदी सरकार व भाजपाला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे.

कोलकाता : दंगली व विद्वेष पसरविणाऱ्या, देशातील घटनात्मक संस्था मोडून टाकणा-या मोदी सरकार व भाजपाला धडा शिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र यायलाच हवे. तसे न केल्यास भाजपा लोकशाहीदेखील पायदळी तुडवेल. त्यामुळे देश व लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून, जनतेनेही दुसºया स्वातंत्र्यासाठी तयार राहावे. औषधांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुदत आता संपली आहे. येत्या लोकसभा निवडणुकांनंतर देशाला नवा पंतप्रधान मिळेल, हे नक्की. तो कोण असेल, याचा विचार नंतर करता येईल, असे सांगत, सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शनिवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांतील भाजपाच्या पराभवानंतर सारे विरोधक प्रथमच एकत्र आले होते. त्यामुळे ही जाहीर सभा २२ विरोधी पक्षांच्या ऐक्याचे दर्शनच होते. परेड ग्राउंडवर ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या सभेला सुमारे ८ लाख लोक हजर होते. भाजपाचे खा. शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह वाजपेयी सरकारधील अरुण शौरी, यशवंत सिन्हा, जसवंत सिंह यांनीही मोदी सरकारवर सडकून टीका केली. मोदी नव्हे, तर जनतेचे प्रश्नच अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सिन्हा यांनी केले, तर जीएसटी घाईघाईत लागू केल्याने अर्थव्यवस्था कोलमडल्याची टीका अरुण शौरी यांनी केली. खरे बोलणे ही बंडखोरी असेल, तर होय, मी बंडखोर आहे, असे शत्रुघ्न सिन्हा ठामपणे म्हणाले.मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपामुळे लोकशाही धोक्यात आल्याची टीका केली, तर दंगली पसरविण्याचे काम भाजपा करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. शरद पवार यांनी आपल्याला आता राजकीय महत्त्वाकांक्षा नाही, असे सांगतानाच, लोकशाही व घटनात्मक संस्था बळकट ठेवण्यासाठी राजकीय परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. देवळांद्वारे भाजपा धार्मिक विद्वेष व तणाव पसरवत असल्याची टीका चंद्राबाबू नायडू यांनी केली. हार्दिक पटेल यांनी ‘सुभाषचंद्र बोस गोºयांशी लढले, तर आता आपल्याला चोरांशी लढायचे आहे, असे उद्गार काढले.देश अखंड ठेवण्यासाठी मोदी सरकार हटविणे गरजेचे आहे, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले. देशाला मोदी हुकूमशाहीकडे नेत असून, जनतेने दुसºया स्वातंत्र्यासाठी तयार राहावे, असे स्टॅलिन म्हणाले. गेगांग अपांग व झोराम नॅशनल फ्रंटचे लालडुहावमा यांनी नागरिकत्व विधेयकामुळे ईशान्येकडील राज्ये वेगळी पडत असल्याचा इशारा दिला. रोजगार देण्यातील अपयश, नोटाबंदी व जीएसटीमुळे गेलेल्या नोकºया, अल्पसंख्यांक व दलितांवरील अत्याचार, राफेल घोटाळा, विरोधी सरकारे पाडण्याचा प्रयत्न यांवरूनही या नेत्यांनी टीकेची झोड उठविली.>व्यासपीठावर नेत्यांची मांदियाळीचकाँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे व अभिषेक मनु सिंघवी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, राष्ट्रीय लोक दलाचे अजित सिंग, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन, अलीकडेच भाजपातून बाहेर पडलेले अरुणाचलचे माजी मुख्यमंत्री गेगांग अपांग, पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवाणी, बसपाचे नेते सतीशचंद्र मिश्रा, लोकतांत्रिक जनता दलाचे शरद यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, आसामच्या युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे बद्रुद्दिन अजमल, राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविताना, पंतप्रधानपदाबाबत मतभेद नसल्याचा दावा केला.