शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

दलित, मुस्लिम, आदिवासी हे अनेक भारतीयांच्या खिजगणतीत नाहीत - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 06:53 IST

Rahul Gandhi, Yodi Adityanath News: आदित्यनाथ सरकारवर केली टीका

नवी दिल्ली : भारतीयांपैकी अनेक जण दलित, मुस्लिम, आदिवासी यांना खिजगणतीत धरत नाहीत. त्यांना माणूस म्हणून नीट वागणूक देत नाहीत, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. त्यामुळेच हाथरसमध्ये कोणावरही बलात्कार झालेला नाही, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पोलीस करू शकतात, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

गांधी म्हणाले, ‘हाथरसमध्ये बलात्कार झालेल्या दलित मुलीला योगी आदित्यनाथ किंवा पोलीस, तसेच अनेक भारतीय नागरिकांच्या लेखी काडीचेही महत्त्व नाही. त्यामुळे ते तिच्यावर झालेल्या अत्याचाराची दखल घेत नाहीत. दलित, मुस्लिम, आदिवासींना माणूस म्हणून चांगली वागणूक मिळत नाही, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.’ दलित मुलीवर बलात्कार झाला, असे नमूद करणाऱ्या बातम्या वारंवार छापून येत आहेत. तशा बातम्यांचा हवाला राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत दिला.पीडितेच्या कुटुंबाला हवा न्यायआम्हाला कोणतीही भरपाई नको, फक्त न्याय हवा, अशी मागणी हाथरसमधील दलित मुलीच्या कुटुंबियांनी राहुल व प्रियांका गांधी यांच्याकडे केली होती. दलित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यापासून राहुल व प्रियांका गांधी यांना एकदा उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून त्यांना दिल्लीला परत पाठविले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना हाथरसला जाऊन दलित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथ