शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

corona vaccination : "मोदी सरकराची नियोजनाविनाच घोषणा; पण लसच नाही, मग लसीकरण कसं होणार? ’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 13:50 IST

corona vaccination in India : १८ चे ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणावरून उडालेल्या गोंधळावरून राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाशी लढण्यात मोदी सरकार अपयशी सरकारकडून नियोजनाशिवाय घोषणा होत आहेत. राज्यांना लसी पुरवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहेकेंद्र सरकारने उद्यापासून लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. मात्र लसच उपलब्ध नाही आहे. मग लसीकरण होणार कुठून

मुंबई - देशात मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १ मेपासून देशातील १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस देण्याची घोषणा केली होती. (corona vaccination in India) मात्र प्रत्यक्षात लसीचा तुटवडा असल्याने आता देशातील अनेक राज्यांमध्ये १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरवात होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. (Coronavirus in India) दरम्यान, १८ चे ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणावरून उडालेल्या गोंधळावरून राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ( '' Modi government's announcement without planning; But there is no vaccine, so how can there be vaccination? "Nawab Malik's question mark on central government's Corona vaccination campaign)

देशातील वाढत असलेले कोरोनाचा फैलाव आणि फसलेल्या लसीकरणाच्या नियोजनावरून नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात की, देशात कोरोनाशी लढण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडून नियोजनाशिवाय घोषणा होत आहेत. राज्यांना लसी पुरवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने उद्यापासून लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. मात्र लसच उपलब्ध नाही आहे. मग लसीकरण होणार कुठून, याचं उत्तर मोदी सरकारला द्यावं लागेल, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.   

 देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे देशाच्या अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोना लसीकरण मोहिमेतही अनेक अडथळे येत आहेत. केंद्र सरकारनं १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुरेशा तयारीअभावी केलेली ही घोषणा आता कागदावरच राहण्याची दाट शक्यता आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लसnawab malikनवाब मलिक