शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिवसेना-राष्ट्रवादी मंत्र्यांमध्ये कुरघोडी; उदय सामंतांविरोधात जितेंद्र आव्हाडांची तीव्र शब्दात नाराजी

By प्रविण मरगळे | Updated: January 14, 2021 10:42 IST

मंत्री उदय सामंत यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं स्पष्टीकरण दिलं.

ठळक मुद्देमला कोणतीही कल्पना न देता माझ्या खात्याबाबत बैठक बोलावल्याचं मला कळालंकिमान माझ्या खात्याशी संबंधित बैठक घेताना मंत्र्यांनी मला कळवायला हवं होतंकोणताही मंत्री इतर खात्याच्या बैठका संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीविना घेऊ शकणार नाही

मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तिन्ही पक्षाचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार आहे. परंतु सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकमेकांविरोधात नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या वाद सुरु झाला आहे. जितेंद्र आव्हाडांना कोणतीही कल्पना न देता गृहनिर्माण खात्याची बैठक उदय सामंत यांनी बोलवल्याने या वादाला तोंड फुटलं आहे.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना तीव्र शब्दात याचा विरोध केला आहे. प्रोटोकॉलनुसार एखाद्या खात्याच्या मंत्र्याला स्वत:च्या खात्याबाबत बैठक घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु उदय सामंत यांनी मला कोणतीही कल्पना न देता माझ्या खात्याबाबत बैठक बोलावल्याचं मला कळालं, किमान माझ्या खात्याशी संबंधित बैठक घेताना मंत्र्यांनी मला कळवायला हवं होतं. अशा वागणुकीमुळे गैरसमज निर्माण होतात. एकमेकांना माहिती दिली तर आम्ही एकत्रित आणि निर्णायक पद्धतीने काम करू शकतो असं त्यांनी सांगितले.

तर मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं स्पष्टीकरण दिलं. मागील भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उद्योगमंत्र्याच्या परवानगीशिवाय पुण्यातील एमआयडीसीच्या जागेसंदर्भात बैठक बोलावली होती. त्यावेळी जमिनीमालकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश खडसेंनी अधिकाऱ्यांना दिले होते, त्यानंतर हे प्रकरण खूप गाजलं होतं.

एकनाथ खडसेंच्या या प्रकरणानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय परिपत्रक काढत प्रोटॉकोल पाळण्याचे आदेश दिले तसेच कोणताही मंत्री इतर खात्याच्या बैठका संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीविना घेऊ शकणार नाही असंही म्हटलं होतं. महाविकास आघाडी सरकारमधील वाद राज्यातील जनतेला नवा नाही, कधी काँग्रेसचं शिवसेनेसोबत तर शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी नाराजीची मालिका सुरूच असते. औरंगाबादचं नामांतरण असो वा कृषी कायद्याच्या अंमलबजावणी तर कधी पोलीस खात्यातील बदल्यांमुळे प्रत्येक मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसे