शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-राष्ट्रवादी मंत्र्यांमध्ये कुरघोडी; उदय सामंतांविरोधात जितेंद्र आव्हाडांची तीव्र शब्दात नाराजी

By प्रविण मरगळे | Updated: January 14, 2021 10:42 IST

मंत्री उदय सामंत यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं स्पष्टीकरण दिलं.

ठळक मुद्देमला कोणतीही कल्पना न देता माझ्या खात्याबाबत बैठक बोलावल्याचं मला कळालंकिमान माझ्या खात्याशी संबंधित बैठक घेताना मंत्र्यांनी मला कळवायला हवं होतंकोणताही मंत्री इतर खात्याच्या बैठका संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीविना घेऊ शकणार नाही

मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तिन्ही पक्षाचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार आहे. परंतु सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकमेकांविरोधात नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या वाद सुरु झाला आहे. जितेंद्र आव्हाडांना कोणतीही कल्पना न देता गृहनिर्माण खात्याची बैठक उदय सामंत यांनी बोलवल्याने या वादाला तोंड फुटलं आहे.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना तीव्र शब्दात याचा विरोध केला आहे. प्रोटोकॉलनुसार एखाद्या खात्याच्या मंत्र्याला स्वत:च्या खात्याबाबत बैठक घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु उदय सामंत यांनी मला कोणतीही कल्पना न देता माझ्या खात्याबाबत बैठक बोलावल्याचं मला कळालं, किमान माझ्या खात्याशी संबंधित बैठक घेताना मंत्र्यांनी मला कळवायला हवं होतं. अशा वागणुकीमुळे गैरसमज निर्माण होतात. एकमेकांना माहिती दिली तर आम्ही एकत्रित आणि निर्णायक पद्धतीने काम करू शकतो असं त्यांनी सांगितले.

तर मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं स्पष्टीकरण दिलं. मागील भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उद्योगमंत्र्याच्या परवानगीशिवाय पुण्यातील एमआयडीसीच्या जागेसंदर्भात बैठक बोलावली होती. त्यावेळी जमिनीमालकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश खडसेंनी अधिकाऱ्यांना दिले होते, त्यानंतर हे प्रकरण खूप गाजलं होतं.

एकनाथ खडसेंच्या या प्रकरणानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय परिपत्रक काढत प्रोटॉकोल पाळण्याचे आदेश दिले तसेच कोणताही मंत्री इतर खात्याच्या बैठका संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीविना घेऊ शकणार नाही असंही म्हटलं होतं. महाविकास आघाडी सरकारमधील वाद राज्यातील जनतेला नवा नाही, कधी काँग्रेसचं शिवसेनेसोबत तर शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी नाराजीची मालिका सुरूच असते. औरंगाबादचं नामांतरण असो वा कृषी कायद्याच्या अंमलबजावणी तर कधी पोलीस खात्यातील बदल्यांमुळे प्रत्येक मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसे