शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

“स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं याला म्हणतात”; सचिन सावंतांचा आमदार राम कदमांना चिमटा

By प्रविण मरगळे | Updated: November 18, 2020 15:01 IST

Congress Sachin Sawant on BJP MLA Ram Kadam news: भाजपा नेत्यांना हेदेखील माहिती नाही भाजपा शासित राज्यांमध्ये छठपूजेवर बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देरावणराज चालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं हिंदू धर्माच्या उत्सवांना विरोध करणं बंद कधी करणार? अन्य धर्माच्या उत्सवांना तात्काळ परवानगी दिली जाते परंतु हिंदू धर्मासाठी का नाही? भाजपा आमदार राम कदम यांच्या टीकेवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा टोला

मुंबई – काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छठपुजेला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे भाजपा आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर हिंदूविरोधी असल्याचं टीकास्त्र सोडलं, मात्र याच टीकेवरुन सचिन सावंत यांनी राम कदम यांना चिमटा काढला आहे.

आमदार राम कदम म्हणाले होते की, रावणराज चालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं हिंदू धर्माच्या उत्सवांना विरोध करणं बंद कधी करणार? अन्य धर्माच्या उत्सवांना तात्काळ परवानगी दिली जाते परंतु हिंदू धर्मासाठी का नाही? महाविकास आघाडी सरकारचे निर्णय इटलीवरुन होतात का? छठपूजेला सरकारने परवानगी द्यावी असा इशारा त्यांनी दिला होता, यावर यालाच म्हणतात स्वत:च्या हाताने तोंडाला काळं फासणं, भाजपा नेत्यांना हेदेखील माहिती नाही भाजपा शासित राज्यांमध्ये छठपूजेवर बंदी घालण्यात आली आहे. तर आरएसएस इटलीहून स्थापित झाली होते ऐतिहासिक सत्य आहे अशा शब्दात काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी राम कदमांचा समाचार घेतला.

त्याचसोबत एप्रिल २०२० मध्ये पालघरमधील गडचिंचले गावात साधूंच्या मॉबलिंचिंग प्रकरणात अद्यापपर्यंत २२५ अटक झाल्या आहेत. १५४ हत्याप्रकरणी व ७५ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी! निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल पोलीसांवरही कारवाई करण्यात आली. सदर तपास सीआयडीकडे आहे व न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. असं असताना सात महिन्यांनी पुन्हा भाजपा यावर राजकारण करत आहे असं सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, सदर गडचिंचले गाव हा भाजपाचा गड आहे. गेले दहा वर्षे भाजपा चा सरपंच आहे. आरोपी क्र. ६१ व ६५ यांच्या समवेत बहुसंख्य अटक झालेले आरोपी हे भाजपाचे आहेत. भाजपाच्या संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशी मागितली जात आहे. देशपातळीवर भाजपा राज्यात साधूंच्या हत्या झाल्या. उत्तर प्रदेश मध्ये तसेच कर्नाटक मध्ये तीन पुजारींच्या हत्या झाली. तेथे मात्र ही भाजपाची मंडळी गप्प बसतात. भाजपाचा दांभिकपणा व धर्माचा राजकारणासाठी उपयोग करण्याची हीन मानसिकता निषेधार्ह आहे. भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध अशी टीका सचिन सावंतांनी आमदार राम कदमांवर केली आहे.

काय म्हणाले होते राम कदम?

महाराष्ट्र सरकार धुतराष्ट्राच्या भूमिकेत आहे, पालघरमध्ये साधुंच्या हत्येला इतके दिवस झाले तरी कारवाई नाही, हत्येवेळी राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते, घटनेच्या चौकशीआधीच महाराष्ट्र सरकारने मॉब लिचिंग असल्याचं सांगून टाकलं, सरकारला हा तपास सीबीआयला सोपवावा लागेल. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, याठिकाणी संतांवर अन्याय सहन करणार नाही. हे सरकारने लक्षात ठेवावं असा इशारा राम कदम यांनी दिला होता.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंतRam Kadamराम कदम