शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

“स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं याला म्हणतात”; सचिन सावंतांचा आमदार राम कदमांना चिमटा

By प्रविण मरगळे | Updated: November 18, 2020 15:01 IST

Congress Sachin Sawant on BJP MLA Ram Kadam news: भाजपा नेत्यांना हेदेखील माहिती नाही भाजपा शासित राज्यांमध्ये छठपूजेवर बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देरावणराज चालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं हिंदू धर्माच्या उत्सवांना विरोध करणं बंद कधी करणार? अन्य धर्माच्या उत्सवांना तात्काळ परवानगी दिली जाते परंतु हिंदू धर्मासाठी का नाही? भाजपा आमदार राम कदम यांच्या टीकेवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा टोला

मुंबई – काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपा आमदार राम कदम यांनी केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा छठपुजेला शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे भाजपा आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर हिंदूविरोधी असल्याचं टीकास्त्र सोडलं, मात्र याच टीकेवरुन सचिन सावंत यांनी राम कदम यांना चिमटा काढला आहे.

आमदार राम कदम म्हणाले होते की, रावणराज चालवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं हिंदू धर्माच्या उत्सवांना विरोध करणं बंद कधी करणार? अन्य धर्माच्या उत्सवांना तात्काळ परवानगी दिली जाते परंतु हिंदू धर्मासाठी का नाही? महाविकास आघाडी सरकारचे निर्णय इटलीवरुन होतात का? छठपूजेला सरकारने परवानगी द्यावी असा इशारा त्यांनी दिला होता, यावर यालाच म्हणतात स्वत:च्या हाताने तोंडाला काळं फासणं, भाजपा नेत्यांना हेदेखील माहिती नाही भाजपा शासित राज्यांमध्ये छठपूजेवर बंदी घालण्यात आली आहे. तर आरएसएस इटलीहून स्थापित झाली होते ऐतिहासिक सत्य आहे अशा शब्दात काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी राम कदमांचा समाचार घेतला.

त्याचसोबत एप्रिल २०२० मध्ये पालघरमधील गडचिंचले गावात साधूंच्या मॉबलिंचिंग प्रकरणात अद्यापपर्यंत २२५ अटक झाल्या आहेत. १५४ हत्याप्रकरणी व ७५ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी! निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल पोलीसांवरही कारवाई करण्यात आली. सदर तपास सीआयडीकडे आहे व न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. असं असताना सात महिन्यांनी पुन्हा भाजपा यावर राजकारण करत आहे असं सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, सदर गडचिंचले गाव हा भाजपाचा गड आहे. गेले दहा वर्षे भाजपा चा सरपंच आहे. आरोपी क्र. ६१ व ६५ यांच्या समवेत बहुसंख्य अटक झालेले आरोपी हे भाजपाचे आहेत. भाजपाच्या संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशी मागितली जात आहे. देशपातळीवर भाजपा राज्यात साधूंच्या हत्या झाल्या. उत्तर प्रदेश मध्ये तसेच कर्नाटक मध्ये तीन पुजारींच्या हत्या झाली. तेथे मात्र ही भाजपाची मंडळी गप्प बसतात. भाजपाचा दांभिकपणा व धर्माचा राजकारणासाठी उपयोग करण्याची हीन मानसिकता निषेधार्ह आहे. भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचा जाहीर निषेध अशी टीका सचिन सावंतांनी आमदार राम कदमांवर केली आहे.

काय म्हणाले होते राम कदम?

महाराष्ट्र सरकार धुतराष्ट्राच्या भूमिकेत आहे, पालघरमध्ये साधुंच्या हत्येला इतके दिवस झाले तरी कारवाई नाही, हत्येवेळी राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते, घटनेच्या चौकशीआधीच महाराष्ट्र सरकारने मॉब लिचिंग असल्याचं सांगून टाकलं, सरकारला हा तपास सीबीआयला सोपवावा लागेल. महाराष्ट्राची भूमी संताची आहे, याठिकाणी संतांवर अन्याय सहन करणार नाही. हे सरकारने लक्षात ठेवावं असा इशारा राम कदम यांनी दिला होता.

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंतRam Kadamराम कदम