शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

Satish Sharma: सतीश शर्मा: पायलट ते खासदार; संकटसमयी गांधी घराण्याचे 'गड' राखणारे शिलेदार!

By प्रविण मरगळे | Updated: February 18, 2021 11:26 IST

Veteran Congress leader Captain Satish Sharma dead: १९८० च्या दशकात कॅप्टन सतीश शर्मा यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजकारणात आणलं होतं

ठळक मुद्दे१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनलेराजीव गांधी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठी सांभाळण्याची जबाबदारी विश्वासू मित्र कॅप्टन सतीश शर्माकडे दिली१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर अमेठीत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसने कॅप्टन सतीश शर्मा यांना मैदानात उतरवलं

नवी दिल्ली – काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा(Congress Caption Satish Sharma) यांचं बुधवारी संध्याकाळी गोवा येथे निधन झालं, ७३ वर्षीय कॅप्टन शर्मा मागील काही काळापासून कॅन्सरने ग्रस्त होते, माजी पंतप्रधान राजीव गांधी(Rajiv Gandhi) यांचा सच्चा शिलेदार बनून अमेठी ते रायबरेलीपर्यंत गांधी कुटुंबासाठी नेहमी तत्पर असणारे सतीश शर्मा ३ वेळा लोकसभेत आणि ३ वेळा राज्यसभेचे सदस्य होते.

१९८० च्या दशकात कॅप्टन सतीश शर्मा यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राजकारणात आणलं होतं, तेव्हा ते इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट होते, त्याचवेळी राजीव गांधी हेदेखील पायलट होते, विमान उड्डाणाच्यावेळी कॅप्टन सतीश शर्मा आणि राजीव गांधी यांच्यात घट्ट मैत्री झाली. भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात खऱ्या अर्थाने पाय रोवला. पण कॅप्टन शर्मा हे पायलट म्हणून नोकरी करत होते.

१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले, अशातच राजीव गांधी यांनी आपला लोकसभा मतदारसंघ अमेठी सांभाळण्याची जबाबदारी विश्वासू मित्र कॅप्टन सतीश शर्माकडे दिली, तेव्हा कॅप्टन सतीश शर्मा यांनी नोकरीचा राजीनामा देत राजीव गांधी यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या कोअर टीममध्ये प्रमुख सदस्य बनले.

राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी कॅप्टन सतीश शर्मा यांच्यावर होती, अमेठीमधील विकास कामांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कॅप्टन सतीश शर्मा यांची महत्त्वाची भूमिका ठरली, ८० च्या दशकाअखेर अनेक सहकारी राजीव गांधी यांची साथ सोडून जनता दलात सहभागी झाले, वीपी सिंहपासून अरूण नेहरू पर्यंत अनेकांनी राजीव गांधींविरोधात मोर्चा उघडला. परंतु कॅप्टन सतीश शर्मा यांनी शेवटपर्यंत राजीव गांधी यांची साथ सोडली नाही.

१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर अमेठीत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसने कॅप्टन सतीश शर्मा यांना मैदानात उतरवलं, १९९१ मध्ये राजीव गांधी यांनी अमेठीतून निवडणूक जिंकली होती, परंतु निकाल येण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. त्यामुळे १९९१ मध्ये पुन्हा घेतलेल्या पोटनिवडणुकीत कॅप्टन शर्मा विक्रमी मताधिक्याने निवडून आले. तत्पूर्वी कॅप्टन शर्मा हे मध्यप्रदेशातून राज्यसभेचे खासदार म्हणून काम करत होते. ११ ऑक्टोबर १९४७ मध्ये सतीश शर्मा यांचा जन्म तेलंगणाच्या सिकंदराबाद येथे झाला होता. देहराडून येथून त्यांनी कर्नल ब्राऊन कँब्रिज स्कूलमध्ये शिक्षण घेतले. शर्मा रायबरेली आणि अमेठीमधून ३ वेळा लोकसभेत निवडून गेले होते, तर मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथून ३ वेळा राज्यसभेचे खासदार बनले होते.

पीवी नरसिम्हराव सरकारमध्ये सतीश शर्मा हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते, मात्र १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. संजय सिंह यांनी सतीश शर्मा यांचा पराभव केला. त्यानंतर सोनिया गांधी(Sonia Gandhi) सक्रीय राजकारणात आल्यानंतर कॅप्टन शर्मा यांना १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीची लोकसभेची जागा सोडावी लागली. रायबरेली येथून त्यांना उमेदवारी मिळाली, काँग्रेसच्या सतीश शर्मांविरोधात भाजपाने अरूण नेहरू यांना मैदानात उतरवले, अरूण नेहरू हे राजीव गांधी यांचे नात्याने भाऊ लागत होते, परंतु दोन्ही जागेवर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

राहुल गांधी(Rahul Gandhi) जेव्हा पहिल्यांदा अमेठीतून निवडणूक लढवत होते, तेव्हा त्यांच्या प्रचाराची धुरा कॅप्टन सतीश शर्मा सांभाळत होते, राहुल गांधी भाषण करताना सतीश शर्मा पाठीमागून त्यांना मार्गदर्शन करत होते, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासाठी राजकीय मैदान तयार करण्याचं काम अमेठी आणि रायबरेली इथं सतीश शर्मा यांनी केले.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी