शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे ‘एकला चलो रे’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 04:57 IST

लोकसभेच्या ४२ जागांचा प्रदेश असलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या घोषणा होण्याआधीच राजकारण तापले आहे.

- योगेश पांडेलोकसभेच्या ४२ जागांचा प्रदेश असलेल्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या घोषणा होण्याआधीच राजकारण तापले आहे. तृणमूल काँग्रेसकडून सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपानेदेखील कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. डावे पक्ष एकत्रित येऊन काँग्रेससमवेत हातमिळवणी करत ममतांविरोधात मजबूत आघाडीच्या माध्यमातून आव्हान उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जागावाटपाच्या मुद्यावरुन घोडे अडलेले आहे. अशा स्थितीत काँग्रेसकडून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाले तर अस्तित्व वाचविण्याचा संघर्ष करणाऱ्या डाव्यांसाठी तो मोठा धक्का ठरु शकतो.तृणमूलचे मागील काही काळापासून सातत्याने बंगालमध्ये वर्चस्व राहिले आहे तर भाजपाने मागील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत चांगलीच मुसंडी मारली व मतांच्या टक्केवारीत दुसरे स्थान मिळविले. काँग्रेस व डाव्या पक्षांसाठी मात्र यंदाची निवडणूक ही करो या मरोची ठरणार आहे. बंगालमधील काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचे प्रमाण व जागांचे प्रमाण हे सातत्याने कमी होत आहे. त्यातच मालदा येथील खासदार मौसम नूर व काही आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे अनेक दशके बंगालवर वर्चस्व गाजविल्यानंतर आजच्या तारखेत डाव्या पक्षांची स्थिती खिळखिळी झाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या माध्यमातून मतदारांना परत खेचण्यासाठी डाव्या पक्षांनी एकत्रित मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.‘माकपा’ च्या नेतृत्वात, भाकपा, आरएसपी (रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टी) व ‘फॉरवर्ड ब्लॉक’ एकत्र आले आहेत. सुरुवातीला काँग्रेसलादेखील या आघाडीत आणण्यासाठी डाव्या नेतृत्वाने राजी केले होते. मात्र जागावाटपामुळे आघाडीच्या गाडीला ब्रेक लागले आहेत.काँग्रेसला लोकसभेच्या १८ जागा हव्या आहेत तर डावे पक्ष त्यांना केवळ १२ जागा देण्यासाठी तयार आहे. सद्य:स्थितीत रायगंज व मुर्शिदाबाद या दोन जागांवर ‘माकपा’ चे खासदार आहेत. मात्र मागील पाच वर्षांत आम्ही आमचा जनसंपर्क जास्त वाढविला असून मतदार आमच्याकडे आले आहेत, असा दावा करत काँग्रेसने या दोन जागा मागितल्या आहेत. शिवाय पुरुलिया, कूचबिहार व बरसात या जागांवरदेखील काँग्रेसने दावा केला आहे. परंतु येथून आपले उमेदवार उभे राहणार असल्याचा प्रचार-प्रसार ‘फॉरवर्ड ब्लॉक’ने सुरू केला आहे. ते कुठल्याही परिस्थितीत या जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे काँग्रेसने अद्यापपर्यंत आघाडीत सहभागी होण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भूमिका ठरविण्याचे सर्व अधिकार प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहेत. अशा स्थितीत काँग्रेसने सर्व जागांवर समांतरपणे उमेदवार पडताळणीदेखील सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.>भाजपकडून २०० सभांच्या आयोजनाची तयारीदरम्यान, भाजप बंगालमध्ये ‘मिशन-२३’ घेऊन उतरत आहे. २०१४ च्या निवडणुकांत सुमारे पाच ते सहा जागांवर भाजपाचे उमेदवार दुसºया तर ३० जागांवर तिसºया स्थानी होते. या सर्व जागांवर भाजपाने जोर लावला आहे. बांगलादेशी घुसखोर, भ्रष्टाचार याशिवाय नागरिकत्व विधेयक यावर भाजपाचा भर राहणार आहे. भाजपाकडून येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मोठ्या नेत्यांच्या प्रचाराचा धुराळा उडविण्यात येणार आहे. विविध नेत्यांच्या जवळपास २०० सभांचे आयोजन करण्याचा पक्षाचा मानस आहे.>तृणमूलविरोधातसर्वच पक्ष आक्रमकसेवानिवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांच्या आत्महत्येनंतर राजकारण पेटलेले आहे. यावरुन भाजपा, डावेपक्ष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार हल्ला चढविला. येत्या काळात तृणमूलविरोधात आक्रमणाची धार आणखी वाढणार असेच चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Mamata Banerjeeममता बॅनर्जी