शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजप व सेनेतील वादाला तक्रारींचे खतपाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 08:34 IST

सध्या राज्यात भाजप व शिवसेनेत रंगलेला राजकीय कलगीतुरा हिंगोलीतही रंगत आहे. यावरून या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत आहेत.

सध्या राज्यात भाजप व शिवसेनेत रंगलेला राजकीय कलगीतुरा हिंगोलीतही रंगत आहे. यावरून या दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढत आहेत. एकमेकांच्या हितसंबंधाआड येताना तक्रारींद्वारे सूड उगविण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सदस्यांनी न.प.च्या बैठकीवर बहिष्कार घालताच भाजपने अवैध धंदे, वीज जोडण्या तोडू नये, असे मुद्दे काढून सत्ताधारी सेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हिंगोली नगरपालिकेत थेट जनतेतून निवडून आलेले भाजपचे बाबाराव बांगर हे नगराध्यक्ष आहेत. दुसरीकडे सभागृहात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांचे संख्याबळ जास्त आहे. यापैकी राष्ट्रवादीचेही दिलीप चव्हाण संख्याबळावर उपनगराध्यक्ष झाल्याने राष्ट्रवादी अर्धी सत्तेतच आहे. काँग्रेसला न.प.त सत्तेत कोण आहे, याचा फरक पडत नाही. मात्र, भाजपकडून शिवसेनेला बऱ्याचदा सापत्न वागणूक मिळते, असा वारंवार आरोप होतो. यापूर्वीही शहरातील विकास कामांवरून शिवसेनेचे कळमनुरीचे आ. संतोष बांगर यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर आ. बांगर यांनी मर्जीतील अधिकाऱ्यांची न.प.त वर्णी लावली. मध्यंतरी सगळे आलबेल असताना आ. बांगर यांचे बंधू तथा शिवसेना गटनेते यांनी अर्थसंकल्पीय बैठकीवर बहिष्कार टाकताना न. प. तील कामांच्या दर्जावर तसेच भूमिगत गटार योजनेच्या अर्धवट कामांबाबत प्रश्न उपस्थित केले. यावरून पुन्हा ठिणगी पडली. भाजपचे आ. तान्हाजी मुटकुळे यांनीही सत्ताधारी सेनेला कोंडीत पकडताना जिल्ह्यात अवैध धंदे, वाळू उपसा जोमात सुरू आहे, असा आरोप करून निवेदने दिली. आंदोलनाचा इशारा दिला. महावितरण जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याने वसुलीला आलेल्यांना पिटाळून लावा, असे आवाहन केले. यामुळे पुन्हा भाजप व शिवसेनेतील वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.लोकप्रतिनिधींनीच खेचला निधीजिल्हा वार्षिक योजनेत पुनर्विनियोजनात जिल्ह्यात वरिष्ठ लोकप्रतिनिधींनीच आपल्या कामांना प्राधान्य देत निधी खर्ची घातल्याचा आराेप जि.प.सदस्य व नगरसेवकांतून होत आहे. यामध्ये काँग्रेसने मात्र आपल्या जि.प.सदस्य, नगरसेवक, पक्ष पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य दिले. शिवसेना व राष्ट्रवादीत मात्र तसे न घडल्याने यावरून ओरड होत असल्याचे दिसून येत होते. यात आमदार व खासदारांनीच आपल्या कामांना प्राधान्य दिल्याची ही ओरड आहे. यासाठी अनेक कार्यकर्ते मात्र शेवटपर्यंत निधी मिळावा, यासाठी लढा देताना दिसत होते.पंचायत समित्यांत होतेय खांदेपालटसध्या शिवसेना, काँग्रेसने एकापेक्षा जास्त जणांना संधी मिळावी म्हणून पंचायत समितीत खांदेपालटाची टूम काढली आहे. हिंगोली पंचायत समितीत काँग्रेसच्या उपसभापतीने राजीनामा दिल्यानंतर आता सेनेच्या सभापतींनीही राजीनामा दिला आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र येत येथे सत्ता स्थापन केली होती. आता हे दोन्ही पक्ष नवे पदाधिकारी देणार आहेत. त्याचबरोबर सेनगावातही शिवसेनेने सभापती पदाचा राजीनामा दिला. आता येथे काँग्रेसचा सभापती होणार असल्याची चर्चा आहे.  निवडणुका वर्षभरावर आल्या असताना होत असलेल्या या बदलांतून काय साध्य होणार हा प्रश्नच आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा