शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

व्हीव्हीपॅटवरून सर्व विरोधक एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 05:17 IST

५० टक्के मतांची मोजणी करा- चंद्राबाबू नायडू

मुंबई : निवडणूक आयोगाची विश्वासार्हता महत्त्वाची की मतांच्या मोजणीसाठी लागणारा वेळ; याचा निर्णय आयोगाने घ्यावा, त्यांनी धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसू नये, असे सांगत ५० टक्के व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी आयोगाने करण्याची विरोधी पक्षाची मागणी कायम आहे. त्यासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करत आहोत, असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी विरोधी पक्षांचे देशभरातील नेते हजर होते.‘देश वाचवा, लोकशाही वाचवा’ या विषयाचे प्रेझेंटेशन नायडू यांनी दिले. सत्ताधारी पक्षाकडून ईडी, प्राप्तिकर विभाग, सीबीआयचा गैरवापर होत आहे. देशातील संस्थांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगही त्यास अपवाद नाही, असा आरोपही नायडू यांनी केला. प्राप्तिकर विभागाकडून विरोधी पक्षांना टार्गेट केले जात आहे. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम मशिनबरोबर छेडछाड होत आहे. ईव्हीएम मशिन मॅनिप्युलेट केली जाऊ शकते. १९१ देशांपैकी फक्त १८ देशांनी ईव्हीएम यंत्रणा वापरली आहे. यातील अनेक देश विकसनशील देशात मोडतात. व्हीव्हीपॅटसाठी ९ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. मग त्यातील ५० टक्के मते मोजण्यावर खर्च करण्यास आयोगाचा विरोध का आहे. हे कळत नाही, असेही नायडू म्हणाले.लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले आहे, परंतु ईव्हीएम मशिन हॅक करून किंवा ईव्हीएम मशिनमध्ये गडबड केली जाऊ शकते, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केली. पत्रकार परिषदेला माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, आपचे खासदार संजय सिंग, सीपीआयचे महेंद्र सिंग, पीसीसीचे (आयएनसी) व्हाईस प्रेसिडेंट शांती चौहान, तृणमूल काँग्रेसचे खासदार नजमुल हक, इंडियन युनियन मुस्लीम लीगचे खोरुम ओमर, आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे जनरल सेक्रेटरी डॉ. जी. एच. फर्नांडिस, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील, डीएमकेचे खासदार टी. के. एस. इलानगोवल, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आणि पक्षाचे सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.मॉक व्होटिंगमध्ये भाजपलाच मतेगोव्यात ईव्हीएम मशिनचे मॉक ड्रिल केले गेले. प्रत्येक पक्षाला ९-९ मते दिली गेली. मात्र, मतमोजणीचे बटन दाबले असता, भाजपला १७ मते मिळाल्याचे निदर्शनास आले, तर काँग्रेसला ९, आप पक्षाला ८ आणि अपक्षाला १ मते मिळाल्याची माहिती आपचे खा. संजय सिंग यांनी दिली.उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टिष्ट्वट करून ३५० ईव्हीएम मशिन्समध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याचे सांगतानाच निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून बसला आहे, असा आरोप संजय सिंग यांनी केला.पवारांना बारामती बंदी : बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. त्यानंतर शरद पवार यांनी येथील मतदार नसल्यामुळे मतदारसंघात राहू नये, अशी तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली. माझे मतदान मुंबईमध्ये असले तरी माझे घर बारामती आहे. त्यामुळे मी थांबू शकत होतो. परंतु निवडणूक आयोगाने आम्हाला थांबू दिले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक