शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

संघर्ष शिगेला! राज्यपाल भ्रष्टाचारी, त्यांना पदावरून हटवा; ममता बॅनर्जींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 20:02 IST

ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमधील संघर्ष आणखी शिगेला जाण्याची चिन्हे आहेत.

कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामापासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील वाद अद्यापही शमलेला पाहायला मिळत नाही. याउलट ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमधील संघर्ष आणखी शिगेला जाण्याची चिन्हे आहेत. याचे कारण ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांवर मोठा आरोप करत, ते भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणीही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. (cm mamata banerjee alleged that governor jagdeep dhankhar is a corrupted man)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडे जगदीप धनखर यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. असे राज्यपाल यापूर्वी कधी पाहिले नव्हते, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

राज्यपाल भ्रष्टाचारी आहेत

राज्यपाल जगदीप धनखर भ्रष्ट आहेत. सन १९९६ च्या हवाला जैन प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. एवढेच नव्हे तर, त्याच्यांविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते. जीटीएच्या तपासणीपूर्वी राज्यपालांच्या भेटीची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी कोणत्या लोकांना आपल्याबरोबर घेतले? याची चौकशी झाली पाहिजे. ते उत्तर बंगालमध्ये का गेले? आपण कोणाला भेटलात? भाजपचे आमदार,खासदार अचानक उत्तर बंगालमध्ये का गेले, अशी विचारणाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे. 

चिंता नको? डेल्टा प्लस धोकादायक नाही; CSIR प्रमुखांचा दिलासादायक दावा

राज्यपाल बंगालचे तुकडे करू पाहतायत

राज्यपाल दार्जिलिंगला जाऊन भाजपच्या आमदार, खासदार यांना भेटले. ही मंडळी बंगालचे तुकडे करू पाहतायत. राज्यपालही त्यांच्या सामील असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच राज्यपाल मुद्दाम उत्तर बंगालला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यपाल लोकांना आंदोलन करायला लावतात, हे राज्यपालांचे काम आहे का, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसwest bengalपश्चिम बंगाल