शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

छत्रपती खासदार संभाजीराजे- विजय वडेट्टीवार यांच्यात ओबीसीवरून पुन्हा खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 02:04 IST

Maratha Reservation, OBC, Sambhaji Raje, Vijay Vaddetiwar News: या निमित्ताने दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. ‘प्रसंगी तलवार काढू’ या संभाजीराजेंच्या विधानावरून आधीच दोघांमध्ये खडाजंगी झाली होती.

मुंबई : मराठा समाज ओबीसीमध्ये का येत नाही अशी विचारणा बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला केली होती, असा दावा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केल्यानंतर ‘संभाजीराजे अर्धवट बोलले, याचा मला खेद वाटतो’ अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.

या निमित्ताने दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. ‘प्रसंगी तलवार काढू’ या संभाजीराजेंच्या विधानावरून आधीच दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. वडेट्टीवार यांच्यामुळे मी फार दु:खी आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण नको हे मी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. वडेट्टीवार मला म्हणाले होते की ओबीसीमधून आरक्षण देण्यास तयार आहे. मी म्हणालो कृपया तसे करू नका. विजय वडेट्टीवार असे का वागत आहेत माहिती नाही, असे विधान संभाजीराजे यांनी माध्यमांशी बोलताना केले.काय गफलत झाली...?वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, माझ्या वक्तव्याचा अर्थ संभाजीराजेंनी काय घेतला किंवा त्यांची काय गफलत झाली, हे माहीत नाही. माझे वक्तव्य स्पष्ट होते. आम्ही मराठा समाजातील गरीब मुलांच्या नुकसानीच्या आड येत नाही आणि येण्याचा विषयच नाही, असे आम्ही वारंवार सांगतोय. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या दिमतीला बहुजन समाजच होता. मराठा समाजाने ओबीसी आरक्षणात यावे, असे मी कधीही म्हटलेले नाही.राजेंनी सर्व समाजांचा विचार करावा - भुजबळराजे हे कोणा एका समाजाचे व धर्माचे नसतात तर ते सर्व जनतेचे राजे असतात. त्यामुळे त्यांनी सर्व समाजाचा विचार करावा, असा टोला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला. त्याच बरोबर सध्या सुरू असलेले शाब्दिक वाद थांबवावेत असे मतही व्यक्त केले आहे.

सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्नावर संभाजीराजे यांनी तलवार काढू या वक्त्यव्याने वाद सुरू असून त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ यांनी, राजे तलवारीचा उपयोग ओबीसी वर करतात की आदिवासीवर हा प्रश्न उपस्थित होत असून, मराठा-ओबीसी हे भांडण आता थांबायला हवे, तलवारी नाही पण शब्दांची खणखण देखील थांबायला हवी अशी भूमिकाही त्यांनी मांडली.मराठा समाजाला विविध सवलती एसईबीसीअंतर्गत शासनाचा आदेश जारीसामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गातील घटकांसाठी राज्य शासनाने विविध सवलती दिल्या आहेत. मराठा समाजाला त्याचा मोठा फायदा होईल. राज्य मंत्रिमंडळाने या बाबत निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी करणारा आदेश काढण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत नुकताच निर्णय घेण्यात आला होता.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी होती. ती एसईबीसीसाठी जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवगार्साठी लागू होती ती तशीच आता एसईबीसीसाठी लागू झाली आहे.

सारथी संस्थेसाठी १३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे, त्यास अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास त्याचीही तरतूद करण्यास मान्यता मिळाली आहे.मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एक महिन्याच्या आत एसटी महामंडळात नोकरी दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका व इतर याचिकांमधील निर्णयाच्या तसेच राज्य शासनाने या कामी देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याकरीता दाखल केलेल्या अर्जाच्या निर्णयाच्या अधीन हे आदेश असतील, अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत हे आदेश लागू राहतील असेही यात नमूद केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती