शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

“...याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं पहिल्यांदाच जाहीर 'आभार' पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:43 IST

Narayan Rane: तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. असे मी मानतो

ठळक मुद्देभाजपा खासदार नारायण राणेंना(Narayan Rane) केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यामागं भाजपाची काय रणनीती असावी यावर बरीच चर्चा झाली.केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे यांनी जाहीर आभार पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार अलीकडेच दिल्ली इथं पार पडला. या कॅबिनेट विस्तारात मोदींनी अनेक अनपेक्षित राजीनामे घेतले. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचाही समावेश होता. महाराष्ट्रातील ४ जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. यात सर्वाधिक चर्चेत असणारं नाव माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणेंचे होते.

भाजपा खासदार नारायण राणेंना(Narayan Rane) केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे लघु, सुक्ष्म उद्योग विभागाचा कारभार सोपवला आहे. नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यामागं भाजपाची काय रणनीती असावी यावर बरीच चर्चा झाली. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे यांनी जाहीर आभार पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

वाचा नारायण राणेंनी लिहिलेलं पत्र जसं आहे तसंच...

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी नड्डा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला मिळाली. केंद्रीय मंत्रिपदावर निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यापर्यंत सर्वांनी मला फोन करून व अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या.

काही जणांनी देवाजवळ प्रार्थना केल्या, आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. असे मी मानतो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळत राहो. ही नम्र अपेक्षा, आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे भारावून गेल्यामुळे एक वाक्य माझ्या तोंडी आले ते असे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य यांचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय? असो! भविष्यात प्रत्यक्ष भेटू आणि बोलू असं नारायण राणेंनी पत्रात म्हटलं आहे.

नारायण राणेंना मंत्री का केले?

मुंबई आणि कोकण या दोन्हींमध्ये कनेक्ट असलेला अन् शिवसेनेला भिडणारा नेता म्हणून नारायण राणेंना मंत्री केलं गेलं. नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अफलातून व्यक्तिमत्त्व आहे. बरेच नेते एकमेकांसारखे वागतात, बोलतात. राणे त्यात मोडत नाहीत. ते कोणासारखं वागू शकत नाहीत आणि कोणाला त्यांच्यासारखं वागणं परवडूच शकत नाही. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचे निर्णय  यातून बरेचदा त्यांचं राजकीय नुकसान झालं पण आजवर त्यांनी जे काही मिळवलं ते याच वेगळ्या शैलीमुळे, हेही खरं!

त्यांनी काँग्रेस सोडली तेव्हा लोक म्हणाले, राणे संपले ! मात्र आता देशाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी दमदार रि-एन्ट्री केली. राणेंना भाजपामध्ये घेताना दहा वेळा विचार झाला होता. ते ‘अनप्रेडिक्टेबल’ आहेत, कधी काय बोलतील याचा नेम नाही इथपासून तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या बोलण्याचा एखाद्या वेळी पक्षालाच त्रास होईल, अशी प्रतिक्रिया होती. पण संघाच्या संमतीनंतर राणेंच्या हातात कमळ दिलं गेलं. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना बराच खटाटोप करावा लागला होता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा