शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

“...याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं पहिल्यांदाच जाहीर 'आभार' पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:43 IST

Narayan Rane: तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. असे मी मानतो

ठळक मुद्देभाजपा खासदार नारायण राणेंना(Narayan Rane) केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यामागं भाजपाची काय रणनीती असावी यावर बरीच चर्चा झाली.केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे यांनी जाहीर आभार पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार अलीकडेच दिल्ली इथं पार पडला. या कॅबिनेट विस्तारात मोदींनी अनेक अनपेक्षित राजीनामे घेतले. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचाही समावेश होता. महाराष्ट्रातील ४ जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. यात सर्वाधिक चर्चेत असणारं नाव माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणेंचे होते.

भाजपा खासदार नारायण राणेंना(Narayan Rane) केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे लघु, सुक्ष्म उद्योग विभागाचा कारभार सोपवला आहे. नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यामागं भाजपाची काय रणनीती असावी यावर बरीच चर्चा झाली. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे यांनी जाहीर आभार पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

वाचा नारायण राणेंनी लिहिलेलं पत्र जसं आहे तसंच...

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी नड्डा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला मिळाली. केंद्रीय मंत्रिपदावर निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यापर्यंत सर्वांनी मला फोन करून व अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या.

काही जणांनी देवाजवळ प्रार्थना केल्या, आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. असे मी मानतो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळत राहो. ही नम्र अपेक्षा, आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे भारावून गेल्यामुळे एक वाक्य माझ्या तोंडी आले ते असे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य यांचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय? असो! भविष्यात प्रत्यक्ष भेटू आणि बोलू असं नारायण राणेंनी पत्रात म्हटलं आहे.

नारायण राणेंना मंत्री का केले?

मुंबई आणि कोकण या दोन्हींमध्ये कनेक्ट असलेला अन् शिवसेनेला भिडणारा नेता म्हणून नारायण राणेंना मंत्री केलं गेलं. नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अफलातून व्यक्तिमत्त्व आहे. बरेच नेते एकमेकांसारखे वागतात, बोलतात. राणे त्यात मोडत नाहीत. ते कोणासारखं वागू शकत नाहीत आणि कोणाला त्यांच्यासारखं वागणं परवडूच शकत नाही. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचे निर्णय  यातून बरेचदा त्यांचं राजकीय नुकसान झालं पण आजवर त्यांनी जे काही मिळवलं ते याच वेगळ्या शैलीमुळे, हेही खरं!

त्यांनी काँग्रेस सोडली तेव्हा लोक म्हणाले, राणे संपले ! मात्र आता देशाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी दमदार रि-एन्ट्री केली. राणेंना भाजपामध्ये घेताना दहा वेळा विचार झाला होता. ते ‘अनप्रेडिक्टेबल’ आहेत, कधी काय बोलतील याचा नेम नाही इथपासून तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या बोलण्याचा एखाद्या वेळी पक्षालाच त्रास होईल, अशी प्रतिक्रिया होती. पण संघाच्या संमतीनंतर राणेंच्या हातात कमळ दिलं गेलं. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना बराच खटाटोप करावा लागला होता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा