शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

राज्यपालांच्या दौऱ्यावर मंत्रिमंडळाची नाराजी, 'कोश्यारी मुख्यमंत्री नाही, राज्यपाल आहेत' - मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 09:34 IST

hagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीन दिवसांचा मराठवाडा दौरा आयोजित केला असून, या दौऱ्यात ते उद्घाटन आणि अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेणार आहेत.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीन दिवसांचा मराठवाडा दौरा आयोजित केला असून, या दौऱ्यात ते उद्घाटन आणि अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेणार आहेत. हे सरळ सरळ राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण आहे, असे म्हणत मंत्रिमंडळ बैठकीत या दौऱ्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याबाबत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांच्या सचिवांना वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी, असेही बैठकीत ठरल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली. कोश्यारी मुख्यमंत्री नाहीत, ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी राज्यघटनेने स्थापन झालेल्या व लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये, असेही मलिक म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल कोश्यारी आणि राज्य सरकारचे वाद सुरू आहेत. राज्यपाल सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होती. ही पार्श्वभूमी असताना राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते अल्पसंख्याक विभागाने बांधलेल्या दोन वसतिगृहांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन घेणार आहेत. यासंदर्भात मलिक म्हणाले, राज्यपाल यांचा ५ आणि ६ ऑगस्टचा कार्यक्रम नांदेडचा आहे. अल्पसंख्याक विभागाने बांधलेल्या दोन वसतिगृहांचे उद्घाटन करण्यापूर्वी या विभागाचे मंत्री म्हणून आपल्याला कोणतीही विचारणा झाली नाही. मंत्र्यांच्या अपरोक्ष राज्यपाल असे उद्घाटन करू शकत नाहीत. हे सरळ सरळ सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.  

मुख्य सचिवांनी राजभवनावर जाऊन कळविली नाराजीमंत्रिमंडळ बैठकीत राज्यपालांविषयी झालेल्या चर्चेचा निरोप घेऊन मुख्य सचिव राजभवन येथे गेले होते, असे समजते. मात्र त्या बैठकीत काय झाले, याचा तपशील राजभवनने जाहीर केलेला नाही. तसेच मुख्य सचिवांनीदेखील याविषयी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. 

अल्पसंख्याक विभागाने दोन वसतीगृह बांधले आहेत. त्यांचे उद्घाटन करण्याचा अधिकार सरकारचा आहे. मात्र, राज्यपाल स्वतः उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. हिंगोलीला कोणतेही विद्यापीठ नाही. तरीही त्यांनी १ तास आढावा बैठक घेतली आहे. थेट राज्य सरकारच्या अधिकारांचा वापर राज्यपाल करत आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांना या सर्व अधिकारांची माहिती आहे. मात्र, आता ते मुख्यमंत्री नाहीत, याचा विसर पडला आहे का?- नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण