शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत बैलगाड्यांची शर्यत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 06:19 IST

harad Pawar : पवार आरक्षणासह अन्य विषयावर भाष्य करत असताना बैलगाडा शर्यतीसाठी सुरू असलेल्या या ऑनलाइन प्रतिक्रियांचा जोरदार मारा सुरू होता. त्यामुळे काही प्रेक्षक बुचकाळ्यात पडले होते.

- गौरीशंकर घाळे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आरक्षण मर्यादा आणि राज्यसभेतील गदारोळाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया पेजवरून या परिषदेचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. परंतु, या प्रक्षेपणात ‘’बैलगाडा शर्यत’’ सुरू करण्याची मागणी करत नेटकऱ्यांनी अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. पवार आरक्षणासह अन्य विषयावर भाष्य करत असताना बैलगाडा शर्यतीसाठी सुरू असलेल्या या ऑनलाइन प्रतिक्रियांचा जोरदार मारा सुरू होता. त्यामुळे काही प्रेक्षक बुचकाळ्यात पडले होते. त्यातील काहींनी हा काय प्रकार आहे, अशी विचारणाही केली. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणीने सध्या जोर धरला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील, शेतकी पार्श्वभूमी असलेले लोक सोशल मीडियात हा विषय मांडत आहेत. अनेक नेत्यांच्या पोस्टवर शर्यत सुरू करण्याची मागणी करणारे पोस्ट केले जात आहेत. या मागणीला राजकीय रंगही चढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर या नेत्यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्याची जाहीर मागणीही केली आहे. तर, पंधरा दिवसांत शर्यत सुरू करण्याचा निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही काही गावकऱ्यांनी दिला आहे. सोशल मीडियावर बैलगाडा शर्यतीची मागणी लावून धरणारे विविध पेजही सुरू करण्यात आले आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा विषय जिव्हाळ्याचा बनत असल्याचे चित्र आहे.

सोशल मीडियावर केलेल्या मागण्या‘साहेब, बैलगाडा शर्यत सुरू करा, शर्यत सुरू नाही झाली तर पाच वर्षांत खिलार जात संपून जाईल’, पेटावर बंदी आणा, बाहेरच्या देशातील पेटा नावाची संस्था आपल्यावर राज्य करत आहे, बैलगाडा शर्यत ही आपली ग्रामीण संस्कृती आहे, शर्यतीला ४०० वर्षांचा इतिहास आहे, शर्यतीवरील बंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे, जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाला वगळा, देशी गोवंशाच्या जतन-संवर्धनासाठी शर्यत सुरू झालीच पाहिजे, आपणच शेतकऱ्यांचे वाली आहात-शर्यत सुरू करायला लावा, पेटा हलवा-बैल वाचवा, साहेबांनी लक्षं घातल्यास आठ दिवसात बंदी उठेल... असे शेकड्याने प्रतिक्रिया येऊ लागल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण