शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

"योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर..." 

By सायली शिर्के | Updated: October 6, 2020 12:09 IST

BSP Chief Mayawati On Hathras Gangrape : मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मायावती यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे. "योगी सरकारने चूक सुधारावी व पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं नाहीतर अशा भयानक घटनांना थांबवणं कठीण होईल" असं म्हटलं आहे. तसेच "हाथरस घटनेतील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या जनतेच्या मागणीवर सरकारने लक्ष केंद्रीत केलं, तर अधिक योग्य राहील" असं देखील मायावती यांनी म्हटलं.

मायावती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. पुन्हा एकदा योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "हाथरस येथील पीडित कुटुंबाला ज्या प्रकारे चुकीची व अमानुष वागणूक दिली गेली, त्यामुळे देशभरात प्रचंड संताप आहे. सरकारने आता तरी ही चूक सुधारावी व पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर अशा भयानक घटनांना थांबवणं कठीण होईल" असं मायावती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

"उत्तर प्रदेश सरकारने केलेला आरोप खरा की राजकीय खेळी आहे, हे वेळच ठरवेल"

"हाथरस घटनेच्या आड विकासावर परिणाम करण्यासाठी जातीय दंगली भडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा विरोधकांवर उत्तर प्रदेश सरकारने केलेला आरोप खरा की राजकीय खेळी आहे, हे वेळच ठरवेल. मात्र हाथरस घटनेतील पीडित कुटुंबास न्याय देण्याच्या जनतेच्या मागणीवर सरकारने लक्ष केंद्रीत केलं तर ते अधिक योग्य होईल" असं देखील मायवती यांनी म्हटलं आहे.

"योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर..."; मायावतींचा सल्ला

योगी सरकारने अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलावी नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील असा सल्ला मायावती यांनी याआधी दिला आहे. "हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी व सर्व सत्य माहितीची घेण्यासाठी तिथे 28 सप्टेंबर रोजी सर्वात आधी बसपाचं शिष्टमंडळ गेलं होतं. मात्र पोलीस ठाण्यात बोलवूनच त्यांचा संवाद घडवून आणण्यात आला. या संवादानंतर मिळालेला अहवाल अत्यंत दुःखदायक होता. ज्याने मला माध्यमांकडे जाण्यास भाग पाडलं" असं मायावती यांनी म्हटलं आहे.

“त्यानंतर तिथे गेलेल्या माध्यमांसोबतही गैरवर्तन करण्यात आलं. काल, परवा विरोधी पक्षांचे नेते व लोकांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार हे सर्व अतिशय निषेधार्ह व लज्जास्पद आहे. सरकारला ही अहंकारी व हुकुमशाही वृत्ती बदलण्याचा सल्ला आहे. नाहीतर यामुळे लोकशाहीची मूळच कुमकूवत होतील" असा सल्ला मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांना दिला आहे. 

"योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा"

"योगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा" असं म्हणत मायावती यांनी काही दिवसांपूर्वी टीकास्त्र सोडलं होतं. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यासाठी सक्षम नाहीत. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मायावती यांनी "केंद्र सरकारने नेतृत्व परिवर्तन करावं किंवा तसं करू शकत नसाल तर राष्ट्रपती राजवट लागू केलं जावं. उत्तर प्रदेशच्या जनतेवर दया करा. केंद्र सरकारला आग्रह करते की त्यांनी योगींना गोरखनाथ मठात पाठवावे. मंदिर पसंत नसेल तर त्यांना राम मंदिर निर्माणाचं कार्य देण्यात यावं. महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येत नसेल तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" असं म्हटलं होतं. 

टॅग्स :mayawatiमायावतीHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ