शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आधी पीओके भारतात आणा; कराचीला आपण नंतर जाऊ; राऊतांचा फडणवीसांना टोला

By कुणाल गवाणकर | Updated: November 23, 2020 13:34 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या 'अखंड भारत' विधानावरून संजय राऊतांचा चिमटा

मुंबई: कराची स्वीट्सवरून शिवसेनेमधील मतमतांतरं समोर आली असताना आता यावर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. आमचा अखंड भारतावर विश्वास आहे. त्यामुळे कराची एक दिवस भारतात येईल, असा विश्वास मला वाटतो, असं फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी कराची स्वीट्सच्या मुद्द्यावरून शिवसेनेत असलेल्या मतभेदांवर भाष्य करत टोला लगावला. त्यानंतर फडणवीस यांना लगेचच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं....तेव्हा 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा करण्याचा विचार करू; राऊतांनी सांगितली वेळकराची स्वीट्सच्या नावावरून झालेल्या वादंगावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपला अखंड भारतावर विश्वास असल्याचं म्हटलं. आम्ही अखंड भारत मानतो. एक दिवस कराचीदेखील भारताचा भाग असेल असा मला विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले. शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी कराची स्वीट्समध्ये जाऊन दुकानाचं नाव बदला, अशी मागणी केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. नांदगावकर यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं राऊत म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनीच त्यांच्या नेत्याला समजावलं हे चांगलंच झाल्याचं फडणवीस म्हणाले.यानंतर राऊत यांनी अखंड भारताबद्दलच्या विधानावरून फडणवीस यांना टोला लगावला. फडणवीस यांच्या विधानाचं आम्ही स्वागत करतो. आधी पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारतात आणा. मग नंतर आपण कराचीपर्यंत जाऊ, असा चिमटा त्यांनी काढला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीला आज वर्ष पूर्ण झालं. त्यावरही राऊत यांनी भाष्य केलं. 'ती पहाट नव्हती. अंधकार होता. आता तसं पुन्हा घडणार नाही. पुढील चार वर्षच काय, त्यानंतरही असा प्रकार घडणार नाही,' असं राऊत म्हणाले. पहाटे पहाटे मला जागा आली असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. तेव्हापासून त्यांना झोपच लागलेली नाही. पण आता ती सकाळ पुन्हा येणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं.पहाटेच्या सरकारबाबत फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, आता पहाटेचे नाहीतर...इंधनाचे दर कमी करून दिलासा द्या; राऊतांचा भाजपला सल्लावाढीव वीज बिलांविरोधात आज राज्यभरात भाजपची आंदोलनं सुरू आहेत. त्यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. वाढीव वीज बिल प्रश्नावरून दिलासा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेत्यांनी यासाठी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना भेटावं, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी राऊत यांनी इंधन दरांकडेही लक्ष वेधलं. 'आम्ही वाढीव वीज बिलावरून जनतेला दिलासा देऊ. पण भाजपच्या नेत्यांनी इंधन दराकडे लक्ष द्यावं. त्यातूनही जनतेला दिलासा मिळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरत आहेत. त्यामुळे देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही कमी व्हायला हवेत. सध्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर पाहता पेट्रोल, डिझेलचे दर ४५ ते ५० रुपये असायला हवेत. यासाठी राज्यातल्या भाजप नेत्यांनी प्रयत्न करायला हवेत,' असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारPOK - pak occupied kashmirपीओके