शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पदवीधर निवडणुकीतील नाराजीनं वाढली भाजपाची डोकेदुखी; आणखी एक मित्रपक्ष दुखावला

By प्रविण मरगळे | Updated: November 18, 2020 09:07 IST

Aurangabad Graduate Constituency, BJP News: पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून माघार घेतली, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपामधील नाराजी उफाळून आली.

ठळक मुद्देभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्यात यश आलं. पदवीधर निवडणुकीत तिकीट नाकारल्याने माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाला रामरामयेत्या २५ तारखेपर्यंत शिवसंग्रामला विचारात न घेतल्यास स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशाराही विनायक मेटेंनी दिला आहे.

मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने भाजपा आणि महाविकास आघाडीचं भवितव्य या निवडणुकीच्या निकालावर ठरणार आहे. मात्र निवडणुकीआधीच भाजपाच्या मागे डोकेदुखी वाढत आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेने उमेदवार उभा केला होता, परंतु भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने सदाभाऊ खोत यांची समजूत काढण्यात यश आलं. पुणे पदवीधर निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीतून माघार घेतली, परंतु मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपामधील नाराजी उफाळून आली. पदवीधर निवडणुकीत तिकीट नाकारल्याने माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं जाहीर केले.

दुसरीकडे भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामनेही आता नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा शिवसंग्रामला विचारात घेत नसून पक्षाच्य काही नेत्यांना मराठवाड्याची जागा पाडायची आहे का? असा सवाल विनायक मेटेंनी केला. तसेच याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण द्यावं, येत्या २५ तारखेपर्यंत शिवसंग्रामला विचारात न घेतल्यास स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशाराही विनायक मेटेंनी दिला आहे. त्यामुळे आधीच बंडखोरी आणि नाराजीचा सामना करणाऱ्या भाजपासमोर आणखी एक डोकेदुखी निर्माण झाली आहे.

उमेदवारी अर्ज मागे

जयसिंगराव गायकवाड सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नाराज जयसिंगराव गायकवाड यांनी मराठवाडा विभागातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यासोबतच भाजपाला रामरामही ठोकला. दरम्यान, महाविकास आघाडीमुळे ही निवडणूक भाजपला अवघड जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSadabhau Khotसदाभाउ खोत Vinayak Meteविनायक मेटे