शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

सत्ताधारी पक्षाच्या ‘त्या’ नेत्याविरोधात अत्याचाराचा आरोप; भाजपा केंद्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:46 IST

भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे असल्याचं पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देसत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याविरोधात एका महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. मी एक शिक्षित, सक्षम भारतीय महिला आहे. मला सहानुभूती नको तर न्याय हवा.सत्ताधारी पक्षाचा ‘तो’ नेता मागील ८ वर्षापासून पोलीस आणि सिस्टमचा दुरूपयोग करून मला शिवीगाळ करत आहेत

मुंबई – सत्ताधारी पक्षाचे नेत्याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या नेत्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र पाठवलं आहे. त्या प्रकरणी भाजपा महाराष्ट्रची महिला आघाडी केंद्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे गेली २ वर्ष रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाला दिशा देतात. त्यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात महिला आयोगाला गेली दीड वर्ष झाली तरी अध्यक्षच नाही. म्हणून यासंदर्भात भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे असल्याचं पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला आहे. 

काय आहे हे प्रकरण?

सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याविरोधात महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. माझी हत्या करण्यापूर्वी मला न्याय द्या अशी विनवणी या महिलेने पत्रात केली आहे. हे पत्र संबंधित महिलेने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या महिलेने पत्रात लिहिलं आहे की, मी एक शिक्षित, सक्षम भारतीय महिला आहे. मला सहानुभूती नको तर न्याय हवा. देशातील महिला वास्तविक सुरक्षित आहेत का? सत्ताधारी पक्षाचा ‘तो’ नेता मागील ८ वर्षापासून पोलीस आणि सिस्टमचा दुरूपयोग करून मला शिवीगाळ करत आहेत. मला, माझ्या कुटुंबीयांना आणि नातेवाईक, मित्रपरिवाराला वेगवेगळ्या कारणानं त्रास देत आहेत. प्रत्येक वेळी विविध गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी मला विविध पोलीस स्टेशनला बोलावतात. माझं चारित्र्यहनन आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असं या महिलेने पत्रात लिहिलं आहे.

तसेच ही गोष्ट मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना सांगितल्यानंतरही माझा छळ थांबला नाही. मी वैयक्तिक सुप्रिया सुळे, सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे यांना समस्या सांगितली पण मदत मिळाली नाही. मात्र या लोकांना समस्या सांगितल्यानंतर आणखी त्रास वाढला हे सत्य आहे असं त्या महिलेने म्हटलं आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा