शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

सत्ताधारी पक्षाच्या ‘त्या’ नेत्याविरोधात अत्याचाराचा आरोप; भाजपा केंद्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 14:46 IST

भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे असल्याचं पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देसत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याविरोधात एका महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. मी एक शिक्षित, सक्षम भारतीय महिला आहे. मला सहानुभूती नको तर न्याय हवा.सत्ताधारी पक्षाचा ‘तो’ नेता मागील ८ वर्षापासून पोलीस आणि सिस्टमचा दुरूपयोग करून मला शिवीगाळ करत आहेत

मुंबई – सत्ताधारी पक्षाचे नेत्याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या नेत्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. या महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पत्र पाठवलं आहे. त्या प्रकरणी भाजपा महाराष्ट्रची महिला आघाडी केंद्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे गेली २ वर्ष रोज सकाळी उठून महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाला दिशा देतात. त्यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात महिला आयोगाला गेली दीड वर्ष झाली तरी अध्यक्षच नाही. म्हणून यासंदर्भात भाजपा महाराष्ट्र महिला आघाडी आता केंद्रीय महिला आयोगाला पत्र लिहून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगणार आहे असल्याचं पाटील यांनी नाव न घेता इशारा दिला आहे. 

काय आहे हे प्रकरण?

सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याविरोधात महिलेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. माझी हत्या करण्यापूर्वी मला न्याय द्या अशी विनवणी या महिलेने पत्रात केली आहे. हे पत्र संबंधित महिलेने ट्विटरवर पोस्ट केले आहे. या महिलेने पत्रात लिहिलं आहे की, मी एक शिक्षित, सक्षम भारतीय महिला आहे. मला सहानुभूती नको तर न्याय हवा. देशातील महिला वास्तविक सुरक्षित आहेत का? सत्ताधारी पक्षाचा ‘तो’ नेता मागील ८ वर्षापासून पोलीस आणि सिस्टमचा दुरूपयोग करून मला शिवीगाळ करत आहेत. मला, माझ्या कुटुंबीयांना आणि नातेवाईक, मित्रपरिवाराला वेगवेगळ्या कारणानं त्रास देत आहेत. प्रत्येक वेळी विविध गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी मला विविध पोलीस स्टेशनला बोलावतात. माझं चारित्र्यहनन आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असं या महिलेने पत्रात लिहिलं आहे.

तसेच ही गोष्ट मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना सांगितल्यानंतरही माझा छळ थांबला नाही. मी वैयक्तिक सुप्रिया सुळे, सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे यांना समस्या सांगितली पण मदत मिळाली नाही. मात्र या लोकांना समस्या सांगितल्यानंतर आणखी त्रास वाढला हे सत्य आहे असं त्या महिलेने म्हटलं आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा