शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 12:41 IST

West Bengal Politics: निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. भाजपा नेते तथागत रॉय यांनी निवडणूक निकालानंतर याचे भाकित केले होते.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपाने (BJP) जोरदार वातावरणनिर्मिती केल्याने तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी तिकडे उड्या मारल्या होत्या. मात्र, आता निवडणुकीत तृणमूलने बाजी मारल्याने या नेत्यांनी पुन्हा ममतांच्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते तथागत रॉय यांनी याची शक्यता व्यक्त केली होती. आता त्यांनी मी जे बोललेलो ते खरे ठरत आहे. दिल्लीत जाऊन वरिष्ठांना या आयाराम नेत्यांनी काय केले ते सांगणार आहे, असे म्हटले आहे. (BJP leaders wants to return in TMC after defeat, win in Election.)

 

निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून (trinamool congress) आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. माजी आमदार सोनाली गुहा, दिपेदू विश्वास यांनी पुन्हा तृणमूलमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय अन्य नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेत्यांच्या दाव्यानुसार भाजपातून जवळपास 8 जिंकलेले आमदार आणि काही खासदार तृणमूलमध्ये परत येऊ इच्छित आहेत. यामध्ये मुकुल रॉय यांचे नावही आहे. (Month After Trinamool Win, Defectors Who Joined BJP Queue Up To Return)

तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या लोकांच्या परत जाण्याच्या मुद्द्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्षश दिलीप घोष यांनी सांगितले की, लोकशाहीत हे सुरु असते. काही लोक येतात, हरल्यानंतर परत जातात. काहींना त्यांच्या सुरक्षेची देखील चिंता सतावत आहे, राज्यातील हिंसाचाराच्या राजकारणाला ते घाबरत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी नवीन लोकांना पक्षात घ्यावे लागते. जिंकले असते तर ठीक होते, हरले म्हणून आता त्यांना पक्षांतराचा पश्चाताप होत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी