शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

'भाजप'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही: देवेंद्र फडणवीस

By मोरेश्वर येरम | Updated: January 18, 2021 17:10 IST

भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजप नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते. 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. भाजपला मिळत असलेल्या यशाबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. यासोबत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका यावेळी केली. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

"राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. लॉकडाउनकाळात केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी उभं राहिलं. तर राज्य सरकारने कुणालाही मदत केली नाही. यामुळे लोकांचा महाविकास आघाडी सरकारवर आता विश्वास उरलेला नाही", असं फडणवीस म्हणाले.  

शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही"राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

कोकणात अभूतपूर्व यशग्राम पंचायत निवडणूक निकाल कोकणात भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचाही फडणवीस यांनी आवर्जुन उल्लेख केला. "राणे यांच्यामुळे कोकणात आज भाजपला मोठं यश मिळालं आहे. तिथं स्थानिक पातळीवर शिवसेनेविरोधात रोष निर्माण झाला आहे. गावाचा विकास कोण करेल हे पाहून लोकांनी मतदान केलं आहे", असं फडणवीस म्हणाले. 

नामांतरावर केवळ 'टाइमपास'औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुनही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. "औरंगाबादचं नामांतर करण्याची खरंतर या सरकारची इच्छाच नाहीय. शिवसेना आणि काँग्रेस केवळ पत्राचा खेळ खेळत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ आपल्या मतदारांना खूष करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नामांतरावरुन हे सरकार केवळ टाइमपास करत आहे", असं फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपा