शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

"शरद पवार सांभाळताहेत निष्क्रिय मुख्यमंत्र्यांची मर्जी, पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून महाविकास आघाडी सरकार...’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 12:56 IST

Maharashtra Politics: या पूरस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांच्या मदतीच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपिचंद पडळकर (Gopochand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि या सरकारचे निर्माते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई - गेल्या आठवड्यात कोकणातील चिपळूण, महाडसह इतर भागात आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेला महापूर तसेच विविध ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटना यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मात्र या पूरस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांच्या मदतीच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपिचंद पडळकर (Gopochand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि या सरकारचे निर्माते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील बहुतांश भागात पूरस्थिती असताना पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून राज्यातील सरकार खुर्ची बचाव कार्यक्रमात व्यस्त आहे, असा टोला गोपिचंद पडळकर यांनी लगावला आहे. (Gopochand Padalkar Says,"Sharad Pawar is managing the will of the inactive Chief Minister, leaving the flood victims in the air and the government is busy in the  government rescue program"

गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यातील पूरग्रस्त जनतेला सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना हे सरकार खुर्ची बचाव कार्यक्रमात व्यस्त आहे. तसेच या महाविकास आघाडी सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार हे निष्क्रीय मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळत आहेत. तसेच दौरे केले म्हणून आपल्याच पुतण्याला खडसावत आहेत, असा टोला पडळकर यांनी लगावला.

राज्यात कारखानदारांच्या भ्रष्टाचारामुळे बंद पडलेल्या, मोडकळीस आलेल्या कारखान्यांना वाचवण्यासाठी तिजोरीमधून ३८०० कोटींची तरतूद करण्यास हे सरकार मागेपुढे पाहत नाही. मात्र, पुराने उद्ध्वस्त झालेल्या कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागांसाठी या सरकारला तिजोरी उघडता येत नाही. त्यांच्याकडे हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. मागे पूर आला होता. तेव्हा फडणवीस सरकारने तातडीने मदत केली होती, आता आलेल्या पुरामुळे आधीपेक्षा वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता तातडीने प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात यावी. तसेच व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षांसाठी घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजबील माफ करण्यात यावे, अशी मागणी पडळकर यांनी केली. 

दरम्यान, पूर ओसरल्यानंतर या भागांमध्ये नेतेमंडळींचे दौरे सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नेतेमंडळींच्या दौऱ्यांमुळे प्रशासनावरील ताण वाढतो. त्यामुळे नेतेमंडळींनी अशा भागातील दौरे टाळावेत, असा सल्ला दिला होता. त्यावरूनही गोपिचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केली आहे. दौरे केले म्हणून शरद पवार आपल्याच पुतण्याची कानउघाडणी करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण