शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज; “घ्या निवडणुका, MVA ला बहुमत मिळालं तर...”

By प्रविण मरगळे | Updated: January 19, 2021 13:20 IST

निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर वन आहे, परंतु तरीही भाजपाची माती झाली असा शिवसेनेचा दावा आहेतर जनतेच्या विश्वासघाताच्या आरोपातून मुक्ती मिळेल. है हिंमत?भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचं शिवसेनेला आव्हान

मुंबई – राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी स्पष्ट लागले, या निवडणुकीत अनेकांना धक्के बसले. परंतु निकालावरून अद्यापही सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्ष भाजपात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपानेच जिंकल्याचा दावा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस करत आहेत, तर महाविकास आघाडीला जनतेने साथ दिली आहे, त्यामुळे जनतेचा सरकारला कौल नाही असं म्हणणाऱ्यांच्या घरावरील कौल जनतेने काढून घेतली आहेत असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला होता.

यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भातखळकर म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर वन आहे, परंतु तरीही भाजपाची माती झाली असा शिवसेनेचा दावा असेल तर घ्या निवडणुका. MVA(महाविकास आघाडी) ला बहुमत मिळाले तर जनतेच्या विश्वासघाताच्या आरोपातून मुक्ती मिळेल. है हिंमत? असं खुलं चॅलेंज त्यांनी शिवसेनेला दिलं आहे.

भाजपा'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही  

निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष बनला आहे. लॉकडाऊनकाळात केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी उभं राहिलं. तर राज्य सरकारने कुणालाही मदत केली नाही. यामुळे लोकांचा महाविकास आघाडी सरकारवर आता विश्वास उरलेला नाही" राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपाचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे असं त्यांनी सांगितले.

बिनविरोध मिळालेल्या ग्रा. पंचायती

निवडणूक बिनविरोध करण्यात स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली असली तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांच्या ताब्यात किती बिनविरोध ग्रामपंचायती गेल्या हे पाहणे औत्सुक्याचे आहे. स्थानिक आघाड्यांना ५२० ग्राम पंचायती बिनविरोध करता आल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून एकमेकांचे वैरी बनलेल्या शिवसेना भाजपामध्ये खरी चुरस आहे. मोठा कोण हे दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे २७८ तर भाजपाकडे २५७ ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे २१८ ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे १२४ ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे ५ ग्राम पंचायती आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv Senaशिवसेनाgram panchayatग्राम पंचायत